AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यातही टाचांना भेगा पडतात, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा आराम

उन्हाळ्यात त्वचेसह संपूर्ण शरीराची काळजी घेणे महत्त्वाचे असते. अशातच हिवाळ्यात टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु जर उन्हाळ्यातही तुमच्या टाचांना भेगा पडत असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पहावेत.

उन्हाळ्यातही टाचांना भेगा पडतात, 'या' घरगुती उपायांनी मिळवा आराम
| Edited By: | Updated on: Mar 26, 2025 | 7:54 PM
Share

उन्हाळा येताच आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेत असतो. या ऋतूत, बहुतेक लोकं त्यांच्या चेहऱ्याची आणि हातांची काळजी घेण्याकडे लक्ष देतात, परंतु अनेकदा पायांची काळजीकडे दुर्लक्ष होते. परिणामी पायांच्या टाचांना भेगा पडतात. हिवाळ्यात कोरड्या त्वचेमुळे टाचांना भेगा पडणे सामान्य आहे. पण जर उन्हाळ्यातही तुमच्या टाचांना भेगा पडत असतील तर ते चिंतेचा विषय असू शकते. उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की पायांच्या त्वचेचा जास्त कोरडेपणा, पाण्याची कमतरता, धूळ, जास्त घाम येणे आणि चुकीचे पादत्राणे घालणे.

जर उन्हाळ्यात तुमच्या पायांच्या टाचांना भेगा पडत असतील आणि वेदना होत असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही. या लेखात, आम्ही तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुमच्या भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतील आणि पुन्हा मऊ आणि गुळगुळीत होतील.

उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्याची कारणे

टाचांना भेगा पडू नयेत म्हणून, प्रथम त्यांची कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्याची ही मुख्य कारणे असू शकतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते, ज्यामुळे टाचांना तडे जाऊ लागतात. याशिवाय, जास्त वेळ अनवाणी चालल्याने त्वचा कडक आणि कोरडी होते, ज्यामुळे पायांच्या टाचांना भेगा पडतात. घट्ट, सिंथेटिक किंवा निकृष्ट दर्जाचे पादत्राणे घातल्याने टाचांना लवकर तडे जाऊ शकतात. शरीरात व्हिटॅमिन ई, ए आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडची कमतरता देखील टाचांना भेगा पडू शकते.

हे घरगुती उपाय करून पहा

रात्री झोपण्यापुर्वी नारळाच्या तेलाचा वापर करा

नारळच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे भेगा पडलेल्या पायांच्या टाचा लवकर बऱ्या होतात. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुवा. त्यानंतर टाचांना नारळाचे तेल लावा आणि मसाज करा. नंतर कॉटनचे मोजे घाला आणि रात्रभर तसेच राहू द्या. दररोज असे केल्याने काही दिवसांत तुमच्या टाचा मऊ होतील.

मध आणि कोमट पाण्याचा वापर

मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते त्याशिवाय पायांच्या काळजीसाठी भेगा पडलेल्या टाचांना बरे करते. यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात 2-3 चमचे मध मिसळा. त्यात तुमचे पाय 15-20 मिनिटे त्यात ठेवा. हलक्या हातांनी स्क्रब करा, पाय पुसून घ्या आणि थोडी क्रीम लावा. आठवड्यातून 3 वेळा हा उपाय केल्याने टाचा लवकर बऱ्या होतात.

कोरफड आणि ग्लिसरीन लावा

कोरफडीमध्ये दाहक-विरोधी आणि उपचार करणारे गुणधर्म असतात, जे त्वचेला मऊ करतात. अशा परिस्थितीत तुमच्या भेगा पडलेल्या टाचांना बरे करण्यासाठी, 2 चमचे एलोवेरा जेलमध्ये 1 चमचा ग्लिसरीन मिसळा. रात्री टाचांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी धुवा. कोरफड टाचांना आतून पोषण देते आणि त्यांना जलद बरे करते.

केळीचा पॅक बनवा

पिकलेले केळं हे एक उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे भेगा पडलेल्या टाचांना लवकर बरे करते. 1 पिकलेले केळ मॅश करा आणि त्यात थोडे नारळाचे तेल मिक्स करा. त्यानंतर ते टाचांवर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. कोमट पाण्याने पाय धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय केल्याने तुमच्या टाचा लवकर बऱ्या होतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.