AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यातही टाचांना भेगा पडतात, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा आराम

उन्हाळ्यात त्वचेसह संपूर्ण शरीराची काळजी घेणे महत्त्वाचे असते. अशातच हिवाळ्यात टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु जर उन्हाळ्यातही तुमच्या टाचांना भेगा पडत असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पहावेत.

उन्हाळ्यातही टाचांना भेगा पडतात, 'या' घरगुती उपायांनी मिळवा आराम
| Edited By: | Updated on: Mar 26, 2025 | 7:54 PM
Share

उन्हाळा येताच आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेत असतो. या ऋतूत, बहुतेक लोकं त्यांच्या चेहऱ्याची आणि हातांची काळजी घेण्याकडे लक्ष देतात, परंतु अनेकदा पायांची काळजीकडे दुर्लक्ष होते. परिणामी पायांच्या टाचांना भेगा पडतात. हिवाळ्यात कोरड्या त्वचेमुळे टाचांना भेगा पडणे सामान्य आहे. पण जर उन्हाळ्यातही तुमच्या टाचांना भेगा पडत असतील तर ते चिंतेचा विषय असू शकते. उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की पायांच्या त्वचेचा जास्त कोरडेपणा, पाण्याची कमतरता, धूळ, जास्त घाम येणे आणि चुकीचे पादत्राणे घालणे.

जर उन्हाळ्यात तुमच्या पायांच्या टाचांना भेगा पडत असतील आणि वेदना होत असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही. या लेखात, आम्ही तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुमच्या भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतील आणि पुन्हा मऊ आणि गुळगुळीत होतील.

उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्याची कारणे

टाचांना भेगा पडू नयेत म्हणून, प्रथम त्यांची कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्याची ही मुख्य कारणे असू शकतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते, ज्यामुळे टाचांना तडे जाऊ लागतात. याशिवाय, जास्त वेळ अनवाणी चालल्याने त्वचा कडक आणि कोरडी होते, ज्यामुळे पायांच्या टाचांना भेगा पडतात. घट्ट, सिंथेटिक किंवा निकृष्ट दर्जाचे पादत्राणे घातल्याने टाचांना लवकर तडे जाऊ शकतात. शरीरात व्हिटॅमिन ई, ए आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडची कमतरता देखील टाचांना भेगा पडू शकते.

हे घरगुती उपाय करून पहा

रात्री झोपण्यापुर्वी नारळाच्या तेलाचा वापर करा

नारळच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे भेगा पडलेल्या पायांच्या टाचा लवकर बऱ्या होतात. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुवा. त्यानंतर टाचांना नारळाचे तेल लावा आणि मसाज करा. नंतर कॉटनचे मोजे घाला आणि रात्रभर तसेच राहू द्या. दररोज असे केल्याने काही दिवसांत तुमच्या टाचा मऊ होतील.

मध आणि कोमट पाण्याचा वापर

मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते त्याशिवाय पायांच्या काळजीसाठी भेगा पडलेल्या टाचांना बरे करते. यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात 2-3 चमचे मध मिसळा. त्यात तुमचे पाय 15-20 मिनिटे त्यात ठेवा. हलक्या हातांनी स्क्रब करा, पाय पुसून घ्या आणि थोडी क्रीम लावा. आठवड्यातून 3 वेळा हा उपाय केल्याने टाचा लवकर बऱ्या होतात.

कोरफड आणि ग्लिसरीन लावा

कोरफडीमध्ये दाहक-विरोधी आणि उपचार करणारे गुणधर्म असतात, जे त्वचेला मऊ करतात. अशा परिस्थितीत तुमच्या भेगा पडलेल्या टाचांना बरे करण्यासाठी, 2 चमचे एलोवेरा जेलमध्ये 1 चमचा ग्लिसरीन मिसळा. रात्री टाचांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी धुवा. कोरफड टाचांना आतून पोषण देते आणि त्यांना जलद बरे करते.

केळीचा पॅक बनवा

पिकलेले केळं हे एक उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे भेगा पडलेल्या टाचांना लवकर बरे करते. 1 पिकलेले केळ मॅश करा आणि त्यात थोडे नारळाचे तेल मिक्स करा. त्यानंतर ते टाचांवर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. कोमट पाण्याने पाय धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय केल्याने तुमच्या टाचा लवकर बऱ्या होतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...