AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

थंडीच्या दिवसांत बऱ्याच लोकांना पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता, ज्यामुळे तुम्हाला पचनाच्या समस्यांपासून आराम मिळेल.

हिवाळ्यात पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 23, 2023 | 7:42 AM
Share

नवी दिल्ली – हिवाळ्यात पचनाच्या समस्यांमुळे (digestion problem) अनेकांना त्रास होतो. त्यामुळे गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता (gas, acidity, constipation) यासारखा समस्या उद्भवू लागतात. यामुळे खूप अस्वस्थ वाटते तसेच वेदनाही होऊ शकतात. या दरम्यान, मेटाबॉलिज्मचे कार्यही हळूहळू सुरू असते. अनेकदा खराब जीवनशैलीमुळे (bad lifestyle might lead to digestion problems) पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवतात. पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता, ज्यामुळे तुमचे मेटाबॉलिज्म जलद होईल. तसेच पचनाशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळेल.

प्रोसेस्ड पदार्थ

प्रोसेस्ड फूड किंवा प्रक्रिया केलेले अन्न पचवणे खूप कठीण असते. कारण त्या पदार्थांमध्ये फारच कमी फायबर असते. म्हणून, जर तुम्ही खूप प्रक्रिया केलेले अन्न खात असाल तर हळूहळ त्याचे सेवन कमी करा. त्याच्या अतिसेवनामुळे ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

फायबरयुक्त पदार्थ

जर तुम्हाला वारंवार पचनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात भरपूर फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. हे पदार्थ पचनसंस्था निरोगी ठेवतात. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रासही दूर होतो. तुम्ही आहारात रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, सफरचंद, गाजर, नासपत आणि बीट यांसारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.

प्रोबायोटिक

तुमच्या आहारात प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करा. त्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच त्यांच्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यासही मदत होते. तुम्ही दही आणि कोकनट केफिर असे पदार्थ सेवन करू शकता.

बीटर फूड्स

केल, पालक, हळद, कारलं यांसारखे पदार्थ आवर्जून खावेत. हे पाचनतंत्रासाठी खूप उत्तम असतात, तसेच त्यामध्ये पोषक तत्वंही मुबलक प्रमाणात असतात. यातील काही पदार्थ कडू असतात खरं पण त्यांच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ,

भरपूर पाणी प्यावे

प्रत्येक व्यक्तीने दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. दिवसातून किमान ७ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. तसेच पचनसंस्थाही निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीचा त्रास होत नाही.

अन्न चावून खावे

अन्न खाताना त्याकडे संपूर्ण लक्ष देऊन, ते चावून चावून खावे. त्यामुळे अन्न सहज पचण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....