जास्त पाणी प्यायल्याने काय होतं? खूप पाणी प्यायल्याने कोणते आजार होतात?

हेच कारण आहे की आपल्याला नियमित अंतराने पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. असं असून सुद्धा आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की पाणी किंवा इतर कोणत्याही द्रव पदार्थाचे जास्त सेवन आरोग्यास फायद्याऐवजी हानी पोहोचवू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

जास्त पाणी प्यायल्याने काय होतं? खूप पाणी प्यायल्याने कोणते आजार होतात?
Too much of drinking waterImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 1:12 PM

मुंबई: आपल्या शरीराचा बराचसा भाग पाण्याने बनलेला असतो, त्यामुळे आपल्याला दिवसभर तहान लागते. हे द्रव आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास आणि डिहायड्रेशनचा धोका दूर करण्यास मदत करते. हेच कारण आहे की आपल्याला नियमित अंतराने पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. असं असून सुद्धा आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की पाणी किंवा इतर कोणत्याही द्रव पदार्थाचे जास्त सेवन आरोग्यास फायद्याऐवजी हानी पोहोचवू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

पिण्याच्या पाण्याची मर्यादा काय आहे?

  • आता तुमच्या मनात प्रश्न येतो की पाणी कमी प्यायले तरी नुकसान होते आणि जास्त प्यायले तर? तर काय होतं? याबाबत भारतातील प्रसिद्ध आहारतज्ञ म्हणतात, एका मर्यादेपेक्षा जास्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते.
  • या प्रसिद्ध आहारतज्ञ म्हणाल्या की, आपल्या मेंदूत एक थ्रस्ट सेंटर आहे, जे शरीरातील पाण्याचे प्रमाण दर्शवते. अशा वेळी पेप्टाइडची प्रतिक्रिया येते, जी थ्रस्ट सेंटरला सिग्नल देते की आता पाणी पिण्याची गरज आहे.
  • काही लोकांना तहान लागल्यावर जास्त पाणी पिण्याची सवय असते, पण तहान न लागता पाणी प्यायल्यास या सवयीला सायकोजेनिक पॉलीडिप्सिया म्हणतात. यामुळे शरीरातील द्रव पदार्थाचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी चांगले नसते.

अधिक पाणी प्यायल्याने काय परिणाम होतील?

जे लोक जास्त पाणी पितात त्यांच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ लागते, अशा वेळी पेशींमध्ये पाण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे जळजळ वाढते. याला हायपोनाट्रेमिया म्हणतात, हे विशेषत: मेंदूचे नुकसान करते.

हायपोनाट्रेमियाची लक्षणे

  • डोकेदुखी
  • थकवा
  • ऊर्जेची कमतरता
  • मळमळ
  • उलट्या
  • कमी रक्तदाब
  • मसल्स क्रॅम्प
  • अस्वस्थता
  • राग
  • गंभीर परिस्थितीत व्यक्ती कोमातही जाऊ शकते.

आहारतज्ञ म्हणाल्या की, दिवसातून सुमारे 8 ते 10 ग्लास पाणी पिणे पुरेसे आहे, जर आपण यापेक्षा जास्त सेवन केले तर आपण आपल्या शरीराचे शत्रू व्हाल, म्हणून थोडी काळजी घेणे महत्वाचे आहे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Non Stop LIVE Update
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?.
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार.
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?.