AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : गरोदरपणात कोणत्या पदार्थांचे सेवन आई आणि बाळासाठी ठरते लाभदायक ?

निरोगी बाळाच्या जन्मासाठी, गर्भवती महिलेने तिच्या आरोग्याकडे देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी गरोदरपणात स्त्रीच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते.

Health Tips : गरोदरपणात कोणत्या पदार्थांचे सेवन आई आणि बाळासाठी ठरते लाभदायक ?
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 23, 2023 | 4:12 PM
Share

नवी दिल्ली : निरोगी बाळाच्या जन्मासाठी, गर्भवती महिलेने तिच्या आरोग्याकडे (health) देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी गरोदरपणात स्त्रीच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. चांगले अन्न गर्भवती स्त्रीला तंदुरुस्त आणि निरोगी बनवते, तसेच अन्नाचा थेट परिणाम बाळाच्या (impact of food on baby) आरोग्यावर होतो. त्याचबरोबर सकस व पौष्टिक अन्नामुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या समस्याही टाळता येतात. गर्भधारणेदरम्यान स्त्री जे काही खाते त्याचा परिणाम पोटातील बाळावर होत असतो. मुलांचा मेंदू तीक्ष्ण असतो, त्याला संपूर्ण पोषण मिळाले तर प्रसूतीनंतर सुदृढ बालकाचा जन्म होतो. अशा परिस्थितीत स्त्रीने गर्भधारणेदरम्यान काही गोष्टींचे सेवन करणे (food) आवश्यक आहे. ते कोणते हे जाणून घेऊया.

गर्भवती महिलांनी काय खावे ?

पालक

हिरव्या भाज्यांमध्ये सर्व पोषक घटक असतात. यामध्ये पालकाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. पालकामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे असतात. मुलांच्या विकासासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी पालकाचे सेवन आवश्यक आहे. गर्भवती महिलांनी पालकाचे सेवन करावे. यामुळे पोटातील बाळाला चांगले पोषण व आरोग्य आणि तीक्ष्ण मेंदू मिळतो.

अंडी

अंडीही खूप पौष्टिक असतात. त्यामध्ये प्रथिने तसेच जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाणही जास्त असते. बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी व्हिटॅमिन डी महत्वाचे आहे. म्हणूनच गरोदर महिलाही अंडी खाऊ शकतात.

बदाम

बदामामध्ये अनेक पोषक घटक असतात. बदाम खाल्ल्याने मन तीक्ष्ण होते. हे गर्भवती महिला आणि त्यांच्या मुलांना देखील लागू होते. बदामामध्ये अनेक पोषक तत्वं उपलब्ध असतात. गर्भारपणात स्त्रीने बदाम सेवन करावे. यामुळे मुलाच्या मेंदूचा चांगला विकास होतो.

ताजी फळं

फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ताज्या फळांपासून जीवनसत्त्वे मिळतात. अशा परिस्थितीत स्त्रीने गरोदरपणात संत्रा, केळी, आंबा, द्राक्षे, सफरचंद इत्यादी फळांचे सेवन करावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फळांचा रस बनवून पिऊ शकता. डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

दही

दह्याचे सेवन हे गरोदर महिलांसाठी आरोग्यदायी ठरते आणि बाळासाठीही फायदेशीर आहे. दह्यामध्ये व्हिटॅमिन सीसह भरपूर प्रथिने असतात. दररोज दह्याचे सेवन केल्याने प्रसूतीनंतर निरोगी आणि विकसित मूल होते.

दूध

लहान मुलं असोत वा प्रौढ, प्रत्येकाला दूध सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. एक ग्लास दुधात भरपूर पोषक तत्व असतात. गर्भवती महिला आणि तिच्या बाळासाठीही दूध खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीराला ताकद मिळते. आरोग्य चांगले राहते व मुलाच्या मेंदूचा विकास होतो.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.