Health Tips : गरोदरपणात कोणत्या पदार्थांचे सेवन आई आणि बाळासाठी ठरते लाभदायक ?

निरोगी बाळाच्या जन्मासाठी, गर्भवती महिलेने तिच्या आरोग्याकडे देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी गरोदरपणात स्त्रीच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते.

Health Tips : गरोदरपणात कोणत्या पदार्थांचे सेवन आई आणि बाळासाठी ठरते लाभदायक ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 4:12 PM

नवी दिल्ली : निरोगी बाळाच्या जन्मासाठी, गर्भवती महिलेने तिच्या आरोग्याकडे (health) देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी गरोदरपणात स्त्रीच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. चांगले अन्न गर्भवती स्त्रीला तंदुरुस्त आणि निरोगी बनवते, तसेच अन्नाचा थेट परिणाम बाळाच्या (impact of food on baby) आरोग्यावर होतो. त्याचबरोबर सकस व पौष्टिक अन्नामुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या समस्याही टाळता येतात. गर्भधारणेदरम्यान स्त्री जे काही खाते त्याचा परिणाम पोटातील बाळावर होत असतो. मुलांचा मेंदू तीक्ष्ण असतो, त्याला संपूर्ण पोषण मिळाले तर प्रसूतीनंतर सुदृढ बालकाचा जन्म होतो. अशा परिस्थितीत स्त्रीने गर्भधारणेदरम्यान काही गोष्टींचे सेवन करणे (food) आवश्यक आहे. ते कोणते हे जाणून घेऊया.

गर्भवती महिलांनी काय खावे ?

पालक

हे सुद्धा वाचा

हिरव्या भाज्यांमध्ये सर्व पोषक घटक असतात. यामध्ये पालकाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. पालकामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे असतात. मुलांच्या विकासासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी पालकाचे सेवन आवश्यक आहे. गर्भवती महिलांनी पालकाचे सेवन करावे. यामुळे पोटातील बाळाला चांगले पोषण व आरोग्य आणि तीक्ष्ण मेंदू मिळतो.

अंडी

अंडीही खूप पौष्टिक असतात. त्यामध्ये प्रथिने तसेच जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाणही जास्त असते. बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी व्हिटॅमिन डी महत्वाचे आहे. म्हणूनच गरोदर महिलाही अंडी खाऊ शकतात.

बदाम

बदामामध्ये अनेक पोषक घटक असतात. बदाम खाल्ल्याने मन तीक्ष्ण होते. हे गर्भवती महिला आणि त्यांच्या मुलांना देखील लागू होते. बदामामध्ये अनेक पोषक तत्वं उपलब्ध असतात. गर्भारपणात स्त्रीने बदाम सेवन करावे. यामुळे मुलाच्या मेंदूचा चांगला विकास होतो.

ताजी फळं

फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ताज्या फळांपासून जीवनसत्त्वे मिळतात. अशा परिस्थितीत स्त्रीने गरोदरपणात संत्रा, केळी, आंबा, द्राक्षे, सफरचंद इत्यादी फळांचे सेवन करावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फळांचा रस बनवून पिऊ शकता. डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

दही

दह्याचे सेवन हे गरोदर महिलांसाठी आरोग्यदायी ठरते आणि बाळासाठीही फायदेशीर आहे. दह्यामध्ये व्हिटॅमिन सीसह भरपूर प्रथिने असतात. दररोज दह्याचे सेवन केल्याने प्रसूतीनंतर निरोगी आणि विकसित मूल होते.

दूध

लहान मुलं असोत वा प्रौढ, प्रत्येकाला दूध सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. एक ग्लास दुधात भरपूर पोषक तत्व असतात. गर्भवती महिला आणि तिच्या बाळासाठीही दूध खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीराला ताकद मिळते. आरोग्य चांगले राहते व मुलाच्या मेंदूचा विकास होतो.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.