AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रडूबाई…काय गं लगेचच कसं तुझ्या डोळ्यात पाणी येतं…

Health Tips दु:ख असो किंवा आनंद आपल्या डोळ्यात पाणी येतं. डोळ्यातून भावना कळतात असं म्हटलं जातं. एखाद्याला काहीही म्हटलं की डोळ्यात चटकन पाणी येतं. अगदी चित्रपट किंवा सिरीयलमधील एखाद्या भावूक प्रसंग बघतला की सहज त्यांचा डोळ्यात पाणी येतं. डोळ्यात पाणी येणं हे तुमच्या भावनाशी जोडलेलं असतं. आपल्या डोळ्यात रडल्यानंतर पाणी का येतं याचा कधी विचार केला आहे का?

रडूबाई...काय गं लगेचच कसं तुझ्या डोळ्यात पाणी येतं...
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 1:57 PM
Share

काय गं रडूबाई…सतत काय आपलं गंगाजमुना वाहत असते तुझी. असे वाक्य अनेकांनी ऐकले असतात. अती दु:ख झाल्यावर आपल्या डोळ्यात पाणी येतं. तर आनंदही झाला तरी आपण रडतो. तुम्ही हे ऐकलं असेल काय त्याचे मगरचे अश्रू आहेत. यामागे कारण म्हणजे तो खोटं रडत असतो असं या वाक्याचं अर्थ आहे. डोळ्यातून येणारे अश्रू हे आपल्या मनातील भावना सांगण्याचं एक माध्यम असतं.

डोळ्यात पाणी कधी येतं?

पण तुम्हाला माहिती आहे डोळ्यात पाणी येण्याचे पण तीन कारणं आहेत. म्हणजे जेव्हा आपल्याला इफेक्शन होतं किंवा डोळ्याला इजा होते तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येतं. तर बदलेल्या वातावरणात एकदम जोरदार वाऱ्याचा प्रवाहात आपण असल्यास आपल्या डोळ्यात पाणी येतं. तर तिसरं कारण रडण्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी येतं.

का येतं डोळ्यात पाणी?

जेव्हा आपण भावनिकदृष्टा अगदी वरच्या टोक्यावर पोहोचतो तेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू येतात. इमोशनल व्यक्तींच्या डोळ्यात लवकर पाणी येतं. शरीरात होणाऱ्या हॉर्मोन्स बदलामुळेही आपल्या डोळ्यात पाणी येतं. स्त्रीयांमध्ये प्रोलॅक्टीन हे हॉर्मोन अधिक असल्यामुळे स्त्रीया या जास्त रडतात. त्यांच्या डोळ्यात पटकन पाणी येतं. तर आपण पाहिलं आहे पुरुष खूप क्विचत रडतात. कारण पुरुषांच्या शरीरात अधिक प्रमाणात टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन असते. हे पुरुषांना रडण्यापासून रोखून धरतात. म्हणून सहसा पुरुष रडताना दिसत नाही. या दोन हॉर्मोन्सशिवाय इतर काही हॉर्मोन्स आणि न्युरोट्रान्समिटर देखील रडण्यामध्ये महत्त्वाचे असतात.

डोळे कायम ओलसर दिसतात

डोळे निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी ते कायम ओलसर असणे गरचेचं आहे. डोळ्याला आवश्यक असलेला ओलसरपणा राहण्यासाठी अश्रुग्रंथी सतत एक खास द्रव तयार करत असते. हा द्रव पापण्यांच्या हालचालीनुसार आपल्या डोळ्यात पसरलेला असतो. या द्रवामुळे डोळे स्वच्छ राहतात तसंच डोळ्याला झालेली इजाही या द्रवामुळे बरी होते.

कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं

हो सर्वसाधारण कांदा कापताना प्रत्येकाचा डोळ्यात पाणी येतं कारण त्यात असलेलं केमिकलमुळे आपल्या डोळ्यातील अश्रुग्रंथीतून पाणी येण्यास सुरुवात होते. कांद्यामध्ये सिन-प्रोपें‍थि‍यल-एस-ऑक्सातइड या नावाचं केमिकल असतं.

रडणे चांगले असते

हो, म्हणतात रडणे चांगले असते कारण त्यातून तुमच्या भावनांना मार्ग मोकळा मिळतो. तुमचा ताणतणाव या अश्रूतून बाहेर पडतो. त्यामुळे तुम्हाला शांत आणि चांगलं वाटतं. पण मात्र डोळ्यातून येणाऱ्या पाण्याकडे दुर्लक्ष करुनही चालणार नाही. जर तुमच्या डोळ्यात सतत पाणी येत असेल काही कारण नसताना तर हे आजाराचं एक लक्षण असू शकतं. अशावेळी तुम्ही डॉक्टरांशी नक्की संपर्क करा.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

इतर बातम्या-

VIDEO : Elaction Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 19 January 2022

तुम्ही गर्भवती आहात…आणि तरीही अकोल्होलचं सेवन करता आहात…मग सावधान

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.