AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे वाचलंत का? म्हणे रोज आंघोळ केल्याने आरोग्याचे होते नुकसान !

वैयक्तिक स्वच्छतेसाठी बहुतांश लोक रोज आंघोळ करतात, काहीजण तर सका-संध्याकाळ अशी दोन वेळाही आंघोळ करतात. पण अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की रोज आंघोळ करणे योग्य नाही. जाणून घ्या आठवड्यातून किती दिवस आंघोळ करणे योग्य मानले जाते.

हे वाचलंत का? म्हणे रोज आंघोळ केल्याने आरोग्याचे होते नुकसान !
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 07, 2023 | 8:40 AM
Share

नवी दिल्ली – थंडीच्या दिवसांत बरेच जण आंघोळीला (bath) सुट्टी देतात. मित्र-मित्र भेटले की एकमेकांना पहिल्यांदा हेच विचारतात की, काय रे आज आंघोळ केलीस की नाही ? असे फार कमी लोक असतात जे या गारेगार वातावरणात रोज आंघोळ (taking bath daily) करण्याची हिंमत करतात. तर आपल्यापैकी काही जण एक दिवसाआड अंघोळ करणे पसंत करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की अनेक संशोधनांतूनही अशी माहिती समोर आली की रोज आंघोळ करण्यापेक्षा आठवड्यातून काही दिवस आंघोळ करणे जास्त योग्य ठरते. तसेच रोज आंघोळ करणे हे आरोग्यासाठीही नुकसानकारक (side effects of taking bath daily) असते, असेही काही अभ्यासांत म्हटले आहे.

हे प्रकरण नक्की काय आहे, पूर्ण माहिती जाणून घेऊया.

रोज अंघोळ केल्याने होणारे नुकसान

दररोज अंघोळ न करण्याची लोकांची अनेक कारणे असू शकतात. कोणी शरीरातून येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी अंघोळ करतं तर कोणी धार्मिक रितीमुळे रोज आंघोळ करतात. तर काही लोकांना आंघोळ केल्याशिवाय फ्रेशच वाटत नाही, तर काही लोक व्यायाम केल्यानंतर आंघोळ करतात. पण काही लोकं असेही असतात, ज्यांच्याकडे काहीही कारण नसतं तर लोकांच्या दबावामुळे किंवा घरातले लोक काय म्हणतील असा विचार करून त्यांना दररोज आंघोळ करावी लागते. पण दररोज आंघोळ करण्याचे काही दुष्परिणामही असू शकतात

– दररोज आंघोळ केल्याने त्वचा जास्त कोरडी आणि इरिटेटेड होऊ शकते. यासोबतच त्वचेवर खाज येण्याची समस्याही सुरू होते.

– स्किन बॅरिअरटचे नुकसान होते, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढू लागतात आणि त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता असते.

– दररोज आंघोळ केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. याच कारणास्तव, डॉक्टर कधीकधी मुलांना दररोज आंघोळ न करण्याचा सल्ला देतात.

– जे लोक दररोज अँटीबॅक्टेरियल साबणाने आंघोळ करतात त्यांना हे समजत नाही की हे साबण केवळ खराब बॅक्टेरियाच नाही तर त्वचेला फायदा करणारे चांगले बॅक्टेरिया देखील नष्ट करतात.

– दररोज आंघोळ केल्याने शरीराला कोणताही (आरोग्यविषयक) फायदा होत नाही, उलट पाणी, साबण, शाम्पू आणि इतर गोष्टींचे नुकसान होते, ते वेगळेच.

आठवड्यातून किती वेळा आंघोळ करणे पुरेसे ?

दररोज आंघोळ करण्याऐवजी आठवड्यातून 3 दिवस आंघोळ करणे देखील तितकेच फायदेशीर आहे. यामुळे जर हिवाळ्यात रोज आंघोळ करावीशी वाटत नसेल तर एक दिवसाआड मोकळेपणाने आंघोळ करा.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?