AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : हिवाळ्यात फक्त 4 खजूर खाल्ल्याचे आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

खजूर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला जीवनसत्व, कॅलरी, फायबर मिळते. तसंच खजूरमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे आपलं हृदय निरोगी ठेवतात. तर आता आपण खजूर खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. जेणेकरून हिवाळ्यात तुमचं आजारांपासून संरक्षण होईल आणि तुमच्या शरीराला उर्जा मिळेल.

Health : हिवाळ्यात फक्त 4 खजूर खाल्ल्याचे आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
| Updated on: Nov 28, 2023 | 5:26 PM
Share

मुंबई : सध्या थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये अनेक आजार निर्माण होतात. मग सर्दी, खोकला, ताप असे अनेक आजार निर्माण होताना दिसतात. तर अशावेळी आजारांपासून वाचण्यासाठी आणि आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी तुमच्या आहारात खजूरचा समावेश करा. खजूर हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये प्रत्येकाने रिकाम्या पोटी खजूर खाणं गरजेचं आहे. प्रत्येकाने दररोज किमान चार खजूर खावे. मग तुम्ही रात्रभर खजूर पाण्यात भिजवून सकाळी ते खाऊ शकता. तसंच तुम्ही सकाळी देखील तुमच्या आहारात खजूरचा समावेश करू शकता. तसंच तुम्ही न भिजवताही तसंच खजूर खाऊ शकता.

खजूरमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. यामध्ये मग कॅल्शियम, प्रथिने, लोह, व्हिटॅमिन के, सोडियम असे गुणधर्म आढळतात. तसंच खजूर व्हिटॅमिन बी 6 चा देखील स्त्रोत आहे. सोबतच खजूरमध्ये अँटिऑक्सिडंट आढळतात. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, आपले हृदय निरोगी राहते.

खजूर खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसंच आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते. आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात. खजूरमध्ये व्हिटॅमिन के असते जे आपल्या शरीरातील रक्त घट्ट होण्यापासून रोखते. तर खजूरमुळे आपले डोळे स्वच्छ राहतात आणि डोळ्याची संबंधित आजार नाहीसे होतात. सोबतच कर्करोग, मधुमेह या आजारांचा धोका देखील कमी होतो. त्यामुळे प्रत्येकाने दररोज खजूर खाणं खूप गरजेचं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.