AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मासिक पाळीच्या दिवसात तू अल्कोहोलचं सेवन करतेय…थांब मग जरा, हे केल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घे…

मासिक पाळीच्या दिवसात तरुणींना मानसिक आणि शारिरीक समस्यांना तोंड द्यावं लागतं. या दिवसांमध्ये शरीरात झालेल्या हार्मोन्स बदलामुळे कंबर, ओटीपोट, अगदी डोकं सुद्धा दुखतं. अनेक तरुणींना, महिलांना या दिवसात मूड स्विंगचा त्रास पण होतो. अशा वेळी अल्कोहोलचं सेवन किती योग्य आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मासिक पाळीच्या दिवसात तू अल्कोहोलचं सेवन करतेय...थांब मग जरा, हे केल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घे...
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jan 20, 2022 | 2:26 PM
Share

मासिक पाळी हे महिलांना दिलेलं वरदान आहे असं म्हणतात. महिन्यातील ते पाच दिवस महिलांसाठी फार कष्टाचे असतात. आजच्या धावपळीच्या जगात महिलांना घर आणि नोकरी या गोष्टी सांभाळत असतात. त्यामुळे महिन्यातील या 5 दिवसात महिलांना आराम मिळत नाही. आज सोशल लाईफमध्ये महिलांसुद्धा अकोल्होलचं सेवन करायला लागल्या आहेत. मग प्रश्न येतो की मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होल सेवन केल्याने त्रास होतो का? या दिवसांमध्ये अकोल्होलचे सेवन योग्य आहे की अयोग्य? तर तज्ज्ञांच्या मते मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होलचं सेवन करणे चुकीचे आहे. त्याची त्यांनी अनेक कारणं सांगितली आहेत. आपण पण जाणून घेऊयात काय आहेत ती कारणं.

1. पोटात कळा येणे तुम्ही मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होलचे सेवन करत असाल तर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. या दिवसात महिलांना पोटात क्रॅम्प्स येतात. आणि या डिहायड्रेशनमुळे तुम्हाला जास्त क्रॅम्पसचा त्रास होऊ शकतो.

2. मूड खराब होणे मासिक पाळीच्या दिवसात महिलांच्या शरीरात हार्मोन्स बदल होत असतात, त्यामुळे याचा परिणाम त्याचा मूडवर होतो. अशामध्ये जर आपण अकोल्होलचं सेवन केलं तर अकोल्होलमुळेही आपल्या शरीरात हार्मोन्स बदलतात. आणि याचा परिणाम तुमचं मूड जास्त खराब होण्याची शक्यता असते.

3. मॅग्नेशियमवर परिणाम मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होलचं सेवन केल्यास शरीरातील मॅग्नेशियम स्तरावर परिणाम होतो. शरीरातील इतर खजिनांवरही अकोल्होलचा परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही अकोल्होलचं सेवन केल्यास शरीरातील मॅग्नेशियमची पातळी कमी झाली तर शरीरातील साखरेचं प्रमाणही कमी होतं. आणि अशातून तुम्हाला इतर आजाराला समोरे जाण्याची भीती असते.

4. हार्मोन्सवर परिणाम मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होलचं सेवन केल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या हार्मोन्सवर दिसून येतात. शरीरातील एस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरोन हे हार्मोन्स वाढण्याची भीती असते. याचा परिणाम तुमच्या मासिक पाळीच्या दिवसांवर होऊ शकतो. विशेष म्हणजे अनियमित मासिक पाळीचा धोकाही वाढतो.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली