AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘26/11’ पुन्हा झाल्यास युद्ध निश्चित!

वॉशिंगटन : 26/11 च्या मुंबई हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्याच्या आठवणी आजही प्रत्येक मुंबईकराच्या काळजात धडकी भरवतात. 10 वर्षात जखमींच्या जखमा जरी भरल्या असल्या, तरी त्या रात्रीचा तो थरारक अनुभव त्यांना आजही झोपू देत नाही. 2008 मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी हल्ले केले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी […]

‘26/11’ पुन्हा झाल्यास युद्ध निश्चित!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

वॉशिंगटन : 26/11 च्या मुंबई हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्याच्या आठवणी आजही प्रत्येक मुंबईकराच्या काळजात धडकी भरवतात. 10 वर्षात जखमींच्या जखमा जरी भरल्या असल्या, तरी त्या रात्रीचा तो थरारक अनुभव त्यांना आजही झोपू देत नाही.

2008 मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी हल्ले केले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी निरपराध लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला, ग्रेनेड फेकले. शिवाय माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट आणि विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्ये स्फोट केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 166 लोक मारले गेले, तर शेकडो जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिसांच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक पोलिसांना वीरमरण आलं.

अमेरिकी तत्वज्ञ, माजी राजदूत आणि अधिकाऱ्यांच्या मते, जर 26/11 सारखा हल्ला परत झाला, तर भारत-पाकिस्तानात युद्ध होऊ शकतं. मुंबई हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे सांगण्यात आले.

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’च्या 10 दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात 166 लोकांनी आपला जीव गमावला होता, यात काही अमेरिकी नागरीक देखील मृत्यूमुखी पडले. या 10 दहशतवाद्यांपैकी नऊ दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलं, तर अजमल कसाबला पोलिसांनी जीवंत पकडलं. नंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

मुंबई हल्ल्याला 10 वर्ष होऊनही पाकिस्तानात या संबधी कुठल्याही संशयितावर कारवाई करण्यात आलेली नाही. यावरुन हेच दिसून येत की हे प्रकरण पाकिस्तानने गांभिर्याने घेतले नाही. अमेरिकन इंटेलिजेंस एजन्सी सीआयएचे माजी अधिकारी ब्रूस रीडल यांनी पीटीआईला सांगितले की,

“26/11 हल्ल्याच्या पीडितांना अद्यापही हल्ल्याचे मुख्य आरोपी आणि पाकिस्तानी इंटेलिजन्स एजन्सी आयएसआयविरोधात न्यायाची प्रतिक्षा आहे, पण पाकिस्तानात हे शक्य होईल असे वाटत नाही.”

रीडेल यांच्या मते जर या प्रकारचा हल्ला पुन्हा झाला तर दोन्ही देशांमध्ये युद्ध निश्चित आहे.

अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत आणि सध्या हडसन इन्स्टिट्यूटमध्ये दक्षिण व मध्य आशियाचे सिनीअर फेलो आणि संचालक हुसेन हक्कानी यांनी सांगितले की, अमेरिका-पाकिस्तानमधील संबंध पाहता भारतात जर परत असा दहशतवादी हल्ला झाल्यास या परिस्थितीला कसे हाताळले जाईल हे सांगता येत नाही. 26/11 हल्ल्याच्या मुख्य आरोपींविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन पाकिस्तानाने निभावले पाहीजे, असेही हक्कानी यांनी सांगितले.

या हल्ल्या दरम्यान नॅशनल सिक्योरिटी ऑफ द व्हाइट हाऊसमध्ये दक्षिण आशियाचे संचालक असलेले अनीश गोयल यांनी सांगितले की, ‘त्यावेळी भारत-पाकिस्तानातील युद्धाचे वातावरण आमच्या प्राथमिक चिंतेपैकी एक होते, जे आम्ही थांबवण्याच्या प्रयत्नात होतो’.

ओबामा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जर त्या प्रकारचा हल्ला पुन्हा झाला तर दोन्ही देशांत युद्ध होण्याची शक्यता आहे’.

सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सरकार पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमीका घेण्यास पुढे-मागे बघत नाही, सर्जिकल स्ट्राईक हे देखील त्यापैकीच एक होतं, असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ