AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियन सैन्यातील 4 भारतीयांचा मृत्यू, मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये

युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाने सुमारे 200 भारतीय नागरिकांना रशियन सैन्यात सुरक्षा सहाय्यक म्हणून भरती केले आहे. मात्र, यात 4 भारतीय नागरिकांच्या मृत्यू झाल्याने मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मोदी सरकारने रशियन सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे.

रशियन सैन्यातील 4 भारतीयांचा मृत्यू, मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये
pm narendra modi (3)
| Updated on: Jun 22, 2024 | 6:34 PM
Share

रशिया आणि युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियन सैन्याने सुमारे 200 भारतीय नागरिकांना सैन्यात भरती करून घेतले. या युद्धात 4 भारतीय नागरिक मारले गेले आहेत. यावरून मोदी सरकारने कडक पाऊल उचलले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी भारताने रशियन सैन्याला भारतीय नागरिकांची भरती करू नये. आम्ही भरतीवर सत्यापित बंदी घालण्याची मागणी देखील केली आहे,’ असे सांगितले. आतापर्यंत 10 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. तसेच, रशियन सैन्यात भरती झालेल्या भारतीयांची लवकर सुटका करून त्यांना मायदेशी परतण्याची परवानगी द्यावी अशी मागणीकेली आहे. हा मुद्दा रशियन सरकारकडे मांडला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

रशिया-युक्रेन संघर्षात रशियन सैन्यात सेवा करणारे आणखी दोन भारतीय नागरिक मारले गेले आहेत आणि अशा मृत्यूंची संख्या चार झाली आहे. रशियन सैन्यात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांचा प्रश्न हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. आम्ही या मुद्द्यावर नवी दिल्ली आणि मॉस्को या दोन्ही ठिकाणी रशियाच्या संपर्कात आहोत. आम्हाला कारवाईची अपेक्षा आहे, असेही जैस्वाल म्हणाले.

प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, अलीकडेच ठार झालेल्या दोन भारतीयांचे मृतदेह त्वरित परत आणण्यासाठी भारत काम करत आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत. यासोबतच त्यांनी फ्रेंच पत्रकार सेबॅस्टियन फार्सिस यांच्या त्यांना भारत सोडण्यास भाग पाडले गेले या दाव्याचे खंडन केले. ‘वर्क परमिट’च्या नूतनीकरणासाठी त्यांचा अर्ज विचाराधीन आहे. फार्सिस हे ओसीआय कार्डधारक आहेत. नियमानुसार त्यांना पत्रकारितेचे काम करण्यासाठी मंजुरी आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियाच्या ‘राष्ट्रीय सुरक्षेत’ भारतीय गुप्तचर यंत्रणा कोणताही हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे जी काही कथित क्लीप बनविण्यात आली आहे ती निरलस खोटी आहे. डॉक्युमेंटरीमध्ये जे काही दाखविण्यात आले आहे ते भारताची बदनामी करण्याचा विशेष अजेंडा आहे असे दिसते. भारत कोणत्याही दहशतवादाला क्षमा देत नाही, त्याचे समर्थन करत नाही. अशा कोणत्याही प्रयत्नांना आमचा स्पष्ट विरोध आहे असे ते म्हणाले. भारताची बदनामी करण्याचे हे षड्यंत्र आहे असेही ते म्हणाले.

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.