Afghanistan Crisis : जीव वाचवण्यासाठी धडपड, विमानाच्या पंख्यावर बसून प्रवास, उड्डाणानंतर आकाशातून खाली कोसळला

अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळावरुन उड्डाण घेणाऱ्या विमानाच्या चाकाला लटकलेल्या दोघांचा उंचावरुन पडून मृत्यू झाल्याचं कळतंय. तर, काही नागरिक विमानाच्या पंख्यावर बसून जीवघेणा प्रवास करताना दिसत असल्याचं दिसतंय.

Afghanistan Crisis : जीव वाचवण्यासाठी धडपड, विमानाच्या पंख्यावर बसून प्रवास, उड्डाणानंतर आकाशातून खाली कोसळला
विमानातून दोघे कोसळले
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 2:58 PM

काबूल: अमेरिकेनं त्यांचं सैन्यअफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर अवघ्या 6 दिवसांमध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवला आहे. तालिबानानं रविवारी जलालाबाद आणि काबूल शहरावर ताबा मिळवला. तालिबानाच्या सत्तेत राहण्याची मानसिकता नसलेले नागरिक मिळेल त्या मार्गानं देश सोडताना दिसत आहेत. काबूल विमानतळावर अफगाण नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं समोर आलं होतं. अफगाणिस्तानच्या नागरिकांची धडपड व्हिडीओमधून स्पष्ट दिसतेय. अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळावरुन उड्डाण घेणाऱ्या विमानाच्या चाकाला लटकलेल्या दोघांचा उंचावरुन पडून मृत्यू झाल्याचं कळतंय. तर, काही नागरिक विमानाच्या पंख्यावर बसून जीवघेणा प्रवास करताना दिसत असल्याचं दिसतंय.

अफगाणिस्तानातील विमानतळावरील दृश्य

युवकाचा विमानाच्या पंख्यावर बसून देश सोडण्याचा प्रयत्न

अफगाणिस्तानातील बिघडलेल्या परिस्थितीची दाहकता समोर येत आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केलेल्या विमानाच्या पंख्यावर एक युवक बसला होता. विमान आकाशात झेपावल्यावर त्याचा ऊंचावरुन खाली कोसळल्याचं कळतंय. ही दाहक दृश्य तालिबानविषयीची अफगाण नागरिकांमधील भीती दाखवते.

अमेरिकन लष्कराकडून हवेत गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालंय. जो तो देश सोडण्यासाठी प्रयत्न करतोय. विमानतळावरील अफगाण नागिराकांची प्रचंड गर्दी झाल्यानं अमेरिकन लष्करानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलंय. अमेरिकेच्या लष्करानं केलेल्या गोळीबारामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान अमेरिकेनं काबूल विमानतळाचा ताबा घेतला आहे.

विमानतळावर नागरिकांची झुंबड

अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही काळातचं तालिबानने सक्रीय होतं, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला. राजधानी काबूलसह आता अनेक शहरं तालिबानच्या ताब्यात आहेत. यानंतर सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे मात्र स्वत:च्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना सोबत घेऊन देश सोडून पळून गेलेत. ते तझाकिस्तानला पोहोचलेत. अशरफ गनी यांनी विश्वासघात केल्याची भावना अफगाण लोक व्यक्त करतायत. तर, अनेक नागरिक तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे.

इतर बातम्या:

Video: काबूलच्या विमानतळावर आठवडी बाजारासारखी गर्दी, विमान पकडण्यासाठी ‘एसटी’सारखी चढाओढ, अमेरिकेचा ताबा

Afghanistan Crisis : नवा राष्ट्रपती थेट देशाचं नाव बदलण्याची चिन्हं, अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?

Afghanistan Crisis citizen two people who tied themselves to an airplane wheel falling from high as the aircraft takes off

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.