AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agni 5: फक्त चीन-पाकिस्तान नव्हे, अग्नी-5 मिसाईल ‘या’ 5 शक्तिशाली देशांना करु शकते उद्ध्वस्त

भारताच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राची चर्चा जगभरात सुरु आहे. या मिसाईलची ताकद आणि रेंजमुळे जगभरातील भल्या-भल्या देशांना घाम फुटला आहे. अग्नी-5 मुळे चीन आणि पाकिस्तानसह अनेक देशांची चिंता वाढली आहे.

Agni 5: फक्त चीन-पाकिस्तान नव्हे, अग्नी-5 मिसाईल 'या' 5 शक्तिशाली देशांना करु शकते उद्ध्वस्त
agni 5 target area
| Updated on: Aug 22, 2025 | 9:11 PM
Share

भारत संरक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती करत आहे. भारताच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राची चर्चा जगभरात सुरु आहे. या मिसाईलची ताकद आणि रेंजमुळे जगभरातील भल्या-भल्या देशांना घाम फुटला आहे. अग्नी-5 मुळे चीन आणि पाकिस्तानसह रशिया, इराक, सौदी अरेबियासारख्या देशांची चिंता वाढली आहे. आगामी काळात युद्ध झाल्यास अण्वस्त्रांनी सुसज्ज असलेले हे मिसाईल काही मिनिटांतच वरील देशांवर हल्ला करू शकते. अलिकडेच अग्नी-5 चे प्रक्षेपण ओडिशाच्या चांदीपूर येथे पार प़डले. हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरात प्रक्षेपित करण्यात आले आहे.

अग्नी-5 का खास आहे?

भारताचे अग्नी-5 हे क्षेपणास्त्र सर्वात घातक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. यात 7.5 ते 8 टन वजनाचे जड वॉरहेड आहे. हे क्षेपणास्त्र दोन प्रकारे वापरले जाऊ शकते. पहिला प्रकार म्हणजे एअरबर्स्ट. याचा अर्थ या क्षेपणास्त्राचा हवेत स्फोट होईल आणि त्याचे परिणाम जमिनीवर होतील. यामुळे रनवे, एअरबेस आणि रडार सिस्टम पूर्णपणे नष्ट होईल.

अग्नी-5 वापरण्याचा दुसरा प्रकार म्हणजे ते बंकर बस्टर बॉम्बसारखेही काम करते. हे जमिनीच्या आत 80 किमी पर्यंतचे टार्गेट नष्ट करू शकते. याचा वापर शत्रूच्या भूमिगत कमांड सेंटर किंवा अण्वस्त्रे साठवलेल्या ठिकाणांना नष्ट करण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. तसेचत अग्नि-5 क्षेपणास्त्र 90 अंशात तीव्र वळण घेऊनही हल्ला करू शकते. या मिसाईलचे वजन 50 टन आहे आणि रेज सुमारे 5 हजार किमी आहे.

अग्नी-5 कोणत्या देशांवर हल्ला करू शकते?

अग्नी-5 हे क्षेपणास्त्र संपूर्ण चीन आणि पाकिस्तानवर हल्ला करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर हे क्षेपणास्त्र पूर्वेकडील जपान, उत्तरेकडील दक्षिण रशिया, पश्चिमेकडील इराक आणि सौदी अरेबिया, तसेत दक्षिणेकडील ऑस्ट्रेलियाच्या वायव्य समुद्रावर हल्ला करु शकते. तसेच हे दक्षिण आशियासह बऱ्याच देशांना उद्ध्वस्त करण्यात सक्षम आहे. त्यामुळे आगामी काळात युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास या अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या मदतीने भारत शत्रूंवर हल्ला करु शकतो. या क्षेपणास्त्रामुळे भारताची ताकद कित्येक पट वाढलेली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.