पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का; सैनिकांना बंदी बनवून थेट…फोटो समोर येताच खळबळ!

पाकिस्तानी लष्कर आणि बीएलए अर्थात बलुच लिबरेशन आर्मी यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू आहे. असे असतानाच आता तणाव वाढवणारी माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का; सैनिकांना बंदी बनवून थेट...फोटो समोर येताच खळबळ!
bla and pakistan clash
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 15, 2026 | 9:31 PM

Pakistan BLA Clash : पाकिस्तानात नेमहीच काहीतरी घडत असतं. या देशात कधी बॉम्बस्फोट होतो. तर कधी अजब फतवा निघतो. गेल्या काही दिवसांपासून तिथे पाकिस्तानी लष्कर आणि बलुच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलए यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे. बीएलएने पाकिस्तानात काही ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानी लष्करानेही बीएलएच्या तळांना लक्ष्य केले. दरम्यान, आता याच संघर्षाबाबत मोठी आणि हादरवणारी माहिती समोर येत आहे. येथे बीएलएने आम्ही एकूण 17 पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. बीएलएच्या या कारवाईमुळे पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार बीएलएने एकूण 17 पाकिस्तानी सैनिकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना बंदी बनवलं आहे. तसा दवाच बीएलएने केले आहे. यापैकी एकूण 10 सैनिकांना बीएलने सोडले असून अजूनही सात सैनिक त्यांच्याच ताब्यात आहेत. सोबतच या बंदी बनवलेल्या सैनिकांची सुटका हवी असेल तर पाकिस्तानी सरकारकडे बीएलएने मोठी मागणी केली आहे. बलुच भागातील बंदी केलेल्या लोकांची जोपर्यंत पाकिस्तानी सरकार, लष्कर जोपर्यंत सुटका करत नाही तोपर्यंत आम्हीदेखील 17 पाकिस्तानी सैनिकांची सुटका करणार नाही, अशी भूमिका बीएलएने घेतली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

बीएलएच्या मीडिया विभागाचे प्रवक्ते जीयंड बलोच यांनी याबाबत बीएलएची भूमिका स्पष्ट केली आहे. बीएलएची ही कृती ऑपरेशन हिरोफचा दुसरा भाग आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

उरलेल्या 7 सैनिकांवर नेमके आरोप काय?

जीयंड बलोच यांनी सांगितल्यानुसार 17 पैकी 10 पाकिस्तांनी सैनिकांना सोडून देण्यात आलं आहे. सोडून दिलेले 10 सैनिक हे बलुच प्रांतातील स्थानिक पोलीस संघटनांशी संबंधित होते. उर्वरीत 7 सैनिक हे पाकिस्तानी लष्कराशी संबंधित आहेत. बंदी म्हणून ठेवण्यात आलेल्या या सात सैनिकांविषयी बलुच नॅशनल कोर्टात सुनावणी झाली आहे. बीएलएच्या ताब्यात असलेल्या सैनिकांकडून बलुच येथील लोकांना त्रास दिला जातो, असा आरोप करण्यात आला आहे. एवढंच नाही तर बंदी बनवलेल्या सैनिकांवर नरसंहाराचाही आरोप आहे.

पाकिस्तान नेमकी काय भूमिका घेणार?

दरम्यान, आता बीएलएने पाकिस्तानी लष्करातील सैनिकांनाच बंदी बनवल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सरकार किंवा पाकिस्तानी लष्कराने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.