
अमेरिका आणि इस्त्रायलकडून अत्यंत मोठा हल्ला इराणवर करण्यात आला. त्यानंतर जग तणावात आले. इराणकडून थेट महत्वाची होर्मुज खाडी बंद करण्यात आली. ही खाडी बंद असल्याने तेलाची निर्यात आणि आयात जवळपास ठप्प झाली. होर्मुज खाडीत जगभरातील तेलवाहू जहाज अडकून पडली. काही देशांमध्ये तर आणीबाणी लावण्याची वेळ आली. भारत, चीन, बांगलादेश, पाकिस्तान या देशांमध्ये तेल येणे कठीण झाले. भारताचे काही जहाज इराणकडून सोडण्यात आल्याने भारताला मोठा दिलासा मिळाला. सर्व जग होर्मुज खाडी होर्मुज खाडी करत बसलेले असताना दुसरीकडे चीनने मोठा डाव केल्याचे बघायला मिळतंय. चीनने होर्मुज खाडीच्या संकटातून गुपचूप मार्ग काढला. यासोबतच याची भनक त्यांनी कोणालाही लागू दिली नाही. जागतिक बाजारात या युद्धामुळे तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या. ज्यावेळी जग होर्मुज खाडी खुली करण्याकरिता प्रयत्न करत होते, त्यावेळी चीनकडून वेगळ्या पर्यायाचा शोध घेतला जात होता.
चीनच्या ऊर्जा संक्रमणाला दोन मोठ्या सरकारी कंपन्या चालना देत आहेत. स्टेट ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ चायना आणि चायना सदर्न पॉवर ग्रिड. त्या आधीच एक अब्जाहून अधिक लोकांना वीजपुरवठा करत आहेत आणि देशाच्या बहुतांश भागात त्यांचीच वीज आहे. आता, त्या आपली ही व्याप्ती आणखी धोरणात्मक स्तरावर विस्तारत आहेत.
दूरवरच्या अंतरावर कार्यक्षमतेने वीज प्रसारित करू शकणारे देशव्यापी अति-उच्च-व्होल्टेज पारेषण जाळे उभारणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे चीनला आयात केलेल्या तेल आणि वायूवर कमी आणि देशांतर्गत निर्माण होणाऱ्या विजेवर अधिक अवलंबून राहता येईल. ज्यावेळी होर्मुज खाडी बंद होती, त्यावेळी चीनकडून यावर काम केले जात होते.
चीनचे सुपरग्रीड हा फक्त एक पायाभूत सुविधा प्रकल्प नाही. चीनच्या ऊर्जा सुरक्षेला नव्याने आकार देण्यासाठी उचललेले हे एक धोरणात्मक पाऊल आहे. त्यामुळे बाहेरील ऊर्जांवर चीनला फार काही अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. अमेरिकेने या युद्धात थेट चीनला ओढण्याचा प्रयत्न केला पण चीनने या युद्धापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.