AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Space farming: चीनच्या अंतराळवीरांनी अंतराळात केली शेती, 30 सेंटिमीटरपेक्षा जास्त उंचीची भाताची रोपं, आता संशोधनासाठी आणणार पृथ्वीवर

याचबरोबर इतरही काही भाज्या अंतराळात उगवण्यासाठी चिनी अंतराळवीरांचे प्रयत्न सुरु आहेत. चीनच्या तिआनगोंग स्पेस स्टेशनमध्ये असलेल्या झिरो ग्रॅव्हिटी प्रयोगशाळेत सुरु असलेल्या या प्रयोगांना यश मिळत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

Space farming: चीनच्या अंतराळवीरांनी अंतराळात केली शेती, 30 सेंटिमीटरपेक्षा जास्त उंचीची भाताची रोपं, आता संशोधनासाठी आणणार पृथ्वीवर
अंतराळात शेती Image Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Sep 01, 2022 | 8:06 PM
Share

बिजिंग- परग्रहांवर जीवन शोधत असलेले अंतराळवीर नवनवे प्रयोग करीत आहेत. हे सगळे प्रयोग अंतराळात सुरु आहेत. अंतराळावर कब्जा मिळवण्यासाठी काही बलाढ्य देशांमध्ये संघर्षही सुरु आहे. यातच चीनच्या अंतराळ क्षेत्रातील अंतराळवीरांनी एक मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी अंतराळात तांदूळ पिकवला आहे. या अंतराळविरांकडे असलेल्या तांदळाच्या दाण्यातून त्यांनी अंतराळात हे भाताचं रोप पिकवलं आहे. याचबरोबर थेल क्रेस नावाचं एक रोपही अंतराळात उगवण्यात त्यांना यश आलेलं आहे. हे थेल क्रेस पत्ताकोबी किंवा ब्रसल स्पाऊटसारख्या हिरव्या भाज्यांचं प्रतिनिधित्व करतं.

अंतराळात वेगाने झाली रोपांची वाढ

चायनिज अकादमी ऑफ सायन्सने टीव्ही टॅनेल CGTN ला सांगितले की, या थेल क्रेस्टच्या रोपाला एका महिन्यात काही पानेही आली आहेत. तर लांब कणाच्या तांदळातून 30 सेंटिमीटर तर छोट्या कणातून 5 सेटिंमीटर रोपे उगवलेली आहेत.

याचबरोबर इतरही काही भाज्या अंतराळात उगवण्यासाठी चिनी अंतराळवीरांचे प्रयत्न सुरु आहेत. चीनच्या तिआनगोंग स्पेस स्टेशनमध्ये असलेल्या झिरो ग्रॅव्हिटी प्रयोगशाळेत सुरु असलेल्या या प्रयोगांना यश मिळत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

काय आहे प्रयोगांचा हेतू

या अंतराळ स्थानकावर असलेल्या प्रयोगशाळेत निर्माण होणाऱ्या तांदळाच्या रोपांची वाढ कशी होईल, त्याचे संपूर्ण जीवन चक्र कसे असेल, याचा अभ्यास संशोधकांना करायचा आहे. या रोपांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अंतराळातील वातावरणाचा कही उपयोग होईल का, याचाही शोध घेण्यात येतो आहे.

डिसेंबरपर्यंत ही रोपे येणार पृथ्वीवर

अंतराळात उगवण्यात आलेली ही रोपे या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरपर्यंत पृथ्वीवर आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यांची पूर्ण वाढ होण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याने डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. इथे आणल्यानंतर या रोपांची तुलना पृथ्वीवरील रोपांशी करण्यात येणार आहे. या रोपांवर अजून काय संशोधन करण्यात येईल, ते अद्याप गुलदस्त्यातच आहे.

यापूर्वीही झाले होते अंतराळात रोपांवर संशोधन

चीनने अंतराळात रोपे उगवण्यासाठी प्रयोग करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही गेल्या वर्षी जुलैत अंतराळात उगवलेल्या तांदळाच्या पहिल्या बॅचची कापणी करण्यात आली होती. त्यांनी 40 ग्रॅम तांदूळ अंतराळात पाठवले होते. नंतर त्यांची पृथ्वीवर शेती करण्यात आली.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?