काबुल : भारत आणि अफगाणिस्तान मैत्रीने शेजारी राष्ट्र पाकिस्तानची झोप उडालीय. 9 फेब्रुवारी रोजी भारत आणि अफगाणिस्तानमध्ये महत्त्वाचा करार झालाय. यानुसार अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये शहतूत नावाचं धरण बांधण्यात येणार आहे. त्यामुळे भारताच्या कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला पाण्यासाठी देखील तरसावं लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती मोहम्मद अशरफ गणी यांच्या उपस्थितीत एका ऑनलाईन कार्यक्रमात भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर आणि अफगानिस्तानचे पराष्ट्र मंत्री हनीफ अतमार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या (India Afghanistan going to build Shahtoot dam in Kabul project worries Pakistan).