AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Bangladesh Border : भारत-बांग्लादेश बॉर्डरवर तणाव, दोन्ही देशांच सैन्य का आमने-सामने आलं?

India-Bangladesh Border : पाकिस्ताननंतर आता भारत-बांग्लादेश बॉर्डरवर तणाव निर्माण झाल्याच वृत्त आहे. दोन्ही देशांच सैन्य आमने-सामने आलं. ही घटना बॉर्डरच्या पिलर नंबर 1067 जवळ झाली.

India-Bangladesh Border : भारत-बांग्लादेश बॉर्डरवर तणाव, दोन्ही देशांच सैन्य का आमने-सामने आलं?
India-Bangladesh Border
| Updated on: May 27, 2025 | 1:34 PM
Share

भारत-बांग्लादेश बॉर्डरवर पुन्हा एकदा तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. ताजी घटना मंगळवार सकाळची आहे. आसामची सीमा बांग्लादेशाला लागून आहे. तिथे दोन वेगवेगळ्या भागात कुरीग्रामच्या बोराइबारी आणि आसमच्या मनकाछार येथे कथितरित्या भारताची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि बांग्लादेश बॉर्डर गार्ड आमने-सामने आले होते. मंगळवारी बांग्लादेशच्या कुरीग्राम जिल्हयात बोराइबारी बॉर्डरवर तणाव निर्माण झाला होता. तिथल्या नो-मॅन्स-लँड भागात BSF ने 14 जणांना (पुश-इन) म्हणजे बांग्लादेशमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिक आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना बॉर्डरच्या पिलर नंबर 1067 जवळ झाली. BSF च्या जवानांनी 9 पुरुष आणि 5 महिलांना बांग्लादेशमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला.

काही प्रत्यक्षदर्शींनुसार BSF कडून चार राऊंड फायरिंग झाली. BGB ने हा दावा फेटाळून लावला आहे. घटनास्थळी पोहोचून त्यांनी परिस्थिती शांततेने हाताळली. बॉर्डर पार करताना ज्या लोकांना पकडण्यात आलं, ते आता नो मॅन्स लँडमध्ये अडकले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ते सर्व भारताच्या बंदरबन जिल्ह्याचे निवासी असू शकतात. बांग्लादेशने त्यांच्या नागरिकतेची अजून पृष्टी केलेली नाही.

फ्लॅग मीटिंगचा प्रस्ताव

BGB चे जमालपुर बटालियन-35 चे असिस्टेंट डायरेक्टर शमसुल हक यांनी सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात आहे. गोळीबार झाल्याची बातमी अफवा आहे. बीजीबीने शांतता कायम ठेवण्यासाठी फ्लॅग मीटिंगचा प्रस्ताव दिला आहे. बातमी लिहिताना बीएसएफकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही

घटनास्थळावर परिस्थिती नियंत्रणात असल्याच सुरक्षा यंत्रणांनी म्हटलं आहे. पण तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही. बीएसएफ आणि बीजीबीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर उपस्थित आहेत. स्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.