AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Bangladesh Border : भारत-बांग्लादेश बॉर्डरवर तणाव, दोन्ही देशांच सैन्य का आमने-सामने आलं?

India-Bangladesh Border : पाकिस्ताननंतर आता भारत-बांग्लादेश बॉर्डरवर तणाव निर्माण झाल्याच वृत्त आहे. दोन्ही देशांच सैन्य आमने-सामने आलं. ही घटना बॉर्डरच्या पिलर नंबर 1067 जवळ झाली.

India-Bangladesh Border : भारत-बांग्लादेश बॉर्डरवर तणाव, दोन्ही देशांच सैन्य का आमने-सामने आलं?
India-Bangladesh Border
| Updated on: May 27, 2025 | 1:34 PM
Share

भारत-बांग्लादेश बॉर्डरवर पुन्हा एकदा तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. ताजी घटना मंगळवार सकाळची आहे. आसामची सीमा बांग्लादेशाला लागून आहे. तिथे दोन वेगवेगळ्या भागात कुरीग्रामच्या बोराइबारी आणि आसमच्या मनकाछार येथे कथितरित्या भारताची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि बांग्लादेश बॉर्डर गार्ड आमने-सामने आले होते. मंगळवारी बांग्लादेशच्या कुरीग्राम जिल्हयात बोराइबारी बॉर्डरवर तणाव निर्माण झाला होता. तिथल्या नो-मॅन्स-लँड भागात BSF ने 14 जणांना (पुश-इन) म्हणजे बांग्लादेशमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिक आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना बॉर्डरच्या पिलर नंबर 1067 जवळ झाली. BSF च्या जवानांनी 9 पुरुष आणि 5 महिलांना बांग्लादेशमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला.

काही प्रत्यक्षदर्शींनुसार BSF कडून चार राऊंड फायरिंग झाली. BGB ने हा दावा फेटाळून लावला आहे. घटनास्थळी पोहोचून त्यांनी परिस्थिती शांततेने हाताळली. बॉर्डर पार करताना ज्या लोकांना पकडण्यात आलं, ते आता नो मॅन्स लँडमध्ये अडकले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ते सर्व भारताच्या बंदरबन जिल्ह्याचे निवासी असू शकतात. बांग्लादेशने त्यांच्या नागरिकतेची अजून पृष्टी केलेली नाही.

फ्लॅग मीटिंगचा प्रस्ताव

BGB चे जमालपुर बटालियन-35 चे असिस्टेंट डायरेक्टर शमसुल हक यांनी सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात आहे. गोळीबार झाल्याची बातमी अफवा आहे. बीजीबीने शांतता कायम ठेवण्यासाठी फ्लॅग मीटिंगचा प्रस्ताव दिला आहे. बातमी लिहिताना बीएसएफकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही

घटनास्थळावर परिस्थिती नियंत्रणात असल्याच सुरक्षा यंत्रणांनी म्हटलं आहे. पण तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही. बीएसएफ आणि बीजीबीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर उपस्थित आहेत. स्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.