चीनला ज्याची भयंकर भीती तोच निर्णय भारताने घेतला, थेट उडाली झोप, मोठे पाऊल..
भारत आणि चीनचे संबंध सुरूवातीपासूनच व्यवस्थित राहिले नाहीत. चीन कायमच भारताविरोधात कुरघोड्या करतो. मात्र, अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशातील संबंध सुधारताना दिसली. आता भारताने चीनला धक्का देणारा निर्णय घेतला आहे

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारत आणि चीनमधील संबंध सुधारताना दिसले. अनेक वर्षांपासून भारत आणि चीनमधील संबंध तणावात होते. मात्र, जसाही अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लादला तसा चीन भारताच्या जवळ आला आणि थेट अनेक मोठे करार भारतासोबत केले. अमेरिकेने आता भारतावरील टॅरिफ कमी केला असून 50 टक्के टॅरिफ काढून 18 टक्क्यांवर आणला. भारतासोबतच अमेरिकेने चीनवर 200 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर मोठा युटर्न अमेरिकेने घेतला. चीन हा रशियाकडून सर्वात जास्त कच्चे तेल खरेदी करणारा जगातील देश आहे. मात्र, चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ लावला नाही. भारतावर टॅरिफ लावल्यानंतर चीन थेट भारताच्या बाजूने मैदानात उतरला, अमेरिकेचा जोरदार विरोध केला. पण भारत चीनवर कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वास ठेऊ शकत नाही, हे वस्तूस्थिती आहे.
आता नुकताच भारताने चीनला अत्यंत मोठा धक्का दिला. भारताने मोठा निर्णय घेत पॅक्स सिलिकामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावर भारताने सही देखील केली. महत्त्वपूर्ण खनिजे ते आर्टिफिशियल इंटेलिजेंससाठी सप्लाई चेन मजबूत करण्यासाठी मदत करेल. रेअर अर्थ मेटलमध्ये ही भागीदारी महत्वाची ठरेल.
पॅक्स सिलिका से भागीदारी केल्यावर भारताच्या दुर्लभ पृथ्वीच्या खनिजांसाठी चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हा भारताने थेट धक्का चीनला दिल्याचे बोलले जात आहे. हे महत्त्वाच्या खनिजे आणि एआयसाठी पुरवठा साखळी देखील मजबूत करू शकते, हा भारताचा मोठा विजय नक्कीच म्हणावा लागेल.
चीन आणि भारतामध्ये मोठे सीमा वाद आहेत. भारत आणि चीनी सैनिकांमध्ये मोठी झडपही झाली. भारताचा अमेरिकेसोबत वाढलेला तणाव बघता चीनने भारतासोबत जवळीकता वाढवण्याचा प्रयत्न केला. हेच नाही तर रशियाचे अध्यक्ष पुतिन हे चीन दाैऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील चीनला गेले होते. पुतिन आणि नरेंद्र मोदी यांचे अनेक फोटोही व्हायरल झाली होती. यादरम्यान भारताने थेट निर्णय घेत चीनला धक्का दिला.
