AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची झोप उडाली, तालिबानी संरक्षणमंत्र्यास भेटले भारतीय अधिकारी, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांची खेळी काय?

india afghanistan relationship: दीड महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानने काबूलमधून आपला विशेष प्रतिनिधी माघारी बोलवला होता. तसेच दोन्ही देशांच्या सीमेवर अनेकदा चकमकी आणि गोळीबार होत असतो.

पाकिस्तानची झोप उडाली, तालिबानी संरक्षणमंत्र्यास भेटले भारतीय अधिकारी, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांची खेळी काय?
india afghanistan relationship
| Updated on: Nov 09, 2024 | 10:09 AM
Share

India Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार येण्यापूर्वी चांगले संबंध होते. त्यानंतर भारताने सावधपणे पावले उचलली. परंतु आता तालिबान सरकार भारतासोबत जुळवून घेत आहे. त्यामुळे भारतीय पराराष्ट्र मंत्रायलाने तालिबान सरकारशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबान सरकार आल्यानंतर प्रथमच भारतीय पराराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी तालिबान सरकारमधील संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाकिस्तानची मात्र झोप उडाली आहे.

जे.पी.सिंग यांची भेट

परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव जे.पी. सिंग यांनी काबूलमध्ये तालिबानचे संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब मुजाहिद यांच्याशी प्रथमच भेट घेतली. याकूब हे 1996 ते 2001 पर्यंत तालिबान गटाचा माजी सर्वोच्च नेता आणि अफगाणिस्तानचा अमीर मुल्ला उमर यांचा मुलगा आहे.जे. पी. सिंग हे परराष्ट्र मंत्रालयात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण प्रकरणांचे प्रभारी आहेत.

मोदी सरकारकडून अफगाणिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये प्रगती

ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानचे सरकार अफगाणिस्तानमध्ये आले. तालिबाने काबूलचा ताबा घेतला. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध दूरावले होते. परंतु आता भारताला अफगाणिस्तानशी संबंध पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळेच भारतीय अधिकाऱ्याने तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी आणि अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांचीही भेट घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सूचनेनुसार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे एक शिष्टमंडळही त्यांच्यासोबत गेले आहे. तालिबान राजवट आल्यानंतर मोदी सरकार अफगाणिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये पूर्ण प्रगती करत असल्याचे यावरून दिसून येते.

पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

भारत आणि अफगाणिस्तानमधील नात्यांमुळे आता पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या आहेत. पाकिस्तानची झोपच उडली आहे. कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचेमधील नाते चांगले नाही. दीड महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानने काबूलमधून आपला विशेष प्रतिनिधी माघारी बोलवला होता. तसेच दोन्ही देशांच्या सीमेवर अनेकदा चकमकी आणि गोळीबार होत असतो. भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध सुधारण्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, अशी भीती आता पाकिस्तानला वाटत आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.