AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडून पाकिस्तानची पोलखोल, पाक संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखातीचा युनोमध्ये केला वापर

मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाव हल्ल्यात सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादांचा भारत बळी पळला आहे.

भारताकडून पाकिस्तानची पोलखोल, पाक संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखातीचा युनोमध्ये केला वापर
योजना पटेल
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 29, 2025 | 8:52 AM
Share

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे दहशतवाद्यांना पुरस्कृत करणारे धोरण भारताने पुन्हा एकदा जगासमोर आणले आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मदत केली जात असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानची पोलखोल केली आहे. संयुक्त राष्ट्र संघात (युनो) पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला उघडे पाडले आहे.

योजना पटेल यांनी संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानचे नाव न घेता म्हटले की, आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा एक विशेष प्रतिमंडळ नेहमी दुरुपयोग करत आला आहे. या व्यासपीठावरुन भारतावर चुकीचे आरोप लावले जात आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी बैठकीत बोलताना योजना पटेल यांनी पाकिस्तानला जगासमोर उघडे पाडले. भारताविरुद्ध प्रचार करण्यासाठी आणि बेकायदेशीर आरोप करण्यासाठी पाकिस्तान नेहमी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा गैरवापर करत असल्याचे योजना पटेल यांनी म्हटले.

संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी सांगितले की, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीदरम्यान दहशतवादाला पाठिंबा आणि निधी दिल्याची कबुली दिली आहे. आसिफ यांनी दहशतवादी संघटनांना कसा पाठिंबा दिला, दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले, निधी दिले, याबाबत जे सांगितले हे संपूर्ण जगाने पाहिले. त्यांच्या या कबुलीमुळे कोणाला आश्चार्य वाटले नाही. कारण पाकिस्तान जागतिक दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान असल्याचे संपूर्ण जगाला माहीत आहे.

योजना पटेल यांनी म्हटले की, मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाव हल्ल्यात सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादांचा भारत बळी पळला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील देश आणि त्यांच्या नेत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल भारत मनापासून आभारी आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत अमेरिका आणि पाश्चत्य राष्ट्रांच्या दबावामुळे पाकिस्तानने दहशतवादास प्रोत्साहन दिल्याचे घाणरडे काम केले आहे. त्याची किंमत तीन दशकांपासून पाकिस्तान मोजत आहे, असे आसिफ यांनी म्हटले होते.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.