
India-US Trade Deal : भारत-अमेरिका ट्रेड डीलमध्ये एक नवी, मोठी अपडेट आली आहे. अमेरिकेने भारतासोबतच्या व्यापार कराराच्या फॅक्ट शीटमध्ये मोठा बदल केला आहे. या बदलामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. व्हाईट हाऊसच्या फॅक्ट शीटनुसार, आता ट्रेड डीलच्या लिस्टमधून डाळी काढून टाकण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात, भारत आणि अमेरिकेने अंतरिम व्यापार कराराची घोषणा केली. त्यावेळी, व्हाईट हाऊसने एक फॅक्टशीट जारी केली होती, ज्यामध्ये काही मु्द्यांचा समावेश होता, जे भारतासाठी चिंताजनक ठरू शकले असते. त्यावरून अनेक सवालही उपस्थित झाले. मात्र आता अमेरिकेने ही फॅक्टशीट अपडेट केली आहे.
समाविष्ट होते जे भारतासाठी काही चिंता निर्माण करू शकतात. यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत.
ट्रेड डीलच्या फॅक्टशीटमधून अनेक गोष्टी हटवण्यात आल्या आहेत किंवा शब्द बदलण्यात आले आहेत. त्यातील सर्वात महत्वाती म्हणजे डाळ. हो, भारतासाठी सर्वात मोठी चांगली बातमी, म्हणजे डाळींचा उल्लेख पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. यापूर्वी फॅक्टशीटमध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की भारत अमेरिकन डाळींवरील शुल्क कमी करेल किंवा काढून टाकेल. मात्र आता, त्या यादीतून ‘certain pulses’ म्हणजेच ‘काही डाळी’ हे शब्द काढून टाकण्यात आले आहेत. याचाच अर्थ असा की भारताला आता अमेरिकन डाळींवरील शुल्क कमी करण्याची गरज नाही. भारतीय शेतकरी आणि डाळी उत्पादकांसाठी ही खूप चांगली बातमी आहे.
पहिला मोठा बदल डाळींचा
खरं तर, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर, अमेरिका आणि भारत यांची एका ट्रेड डीलवर सहमती झाली. त्यानंतर एक फॅक्टशीट जारी करण्यात आली. व्हाईट हाऊसने आता भारतासोबतच्या व्यापार कराराच्या फॅक्टशीटमध्ये थोडीशी सुधारणा केली आहे. मागील फॅक्टशीटमधील काही मजकूर काढून टाकण्यात आला आहे तसेच काही शब्दरचना देखील बदलण्यात आली आहे. यातील सर्वात पहिला, सर्वात मोठा बदल म्हणजे डाळींबद्दल आहे.
दुसरा मोठा बदल काय ?
त्यातील दुसरा मोठा बदल म्हणजे 500 अब्ज डॉलर्सच्या खरेदीचे आश्वासन. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या फॅक्टशीटमध्ये आधी असं म्हटलं होतं की, भारत हा अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्सच्या वस्तू खरेदी करण्यास वचनबद्ध म्हणजेच ‘committed’ आहे, म्हणजेच त्यांनी ते वचन दिलं आहे. मात्र आता हा शब्द बदलून ‘intend’ करण्यात आला आहे, याचा अर्थ त्यांचा असा विचार किंवा मानस आहे. म्हणजेच भारताने कोणतेही आश्वासन दिलेलं नाही, उलट हा एक हेतू आहे. करारानुसार हेतू बदलू शकतात, परंतु आश्वासने बदलत नाहीत.
याव्यतिरिक्त, “कृषी उत्पादने” हेही खरेदी यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. आता, फक्त ऊर्जा, आयसीटी, कोळसा आणि इतर उत्पादनांचा उल्लेख आहे. याचा अर्थ कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी कोणताही दबाव नाही. सुधारित आवृत्तीमध्ये या लिस्टमधून कृषी उत्पादनांचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे.