AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम हल्ल्यानंतर शेकडो भारतीय पाकिस्तानातून आले, शीख कुटुंबांचा रोखला प्रवेश, म्हणाले की दुबईत…!

भारत आणि पाकिस्तानचे संबंध पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर कमालीचे ताणले गेले आहेत. त्यानंतर आता परस्परांच्या नागरिकांची त्यांच्या - त्यांच्या देशात पाठवणूक केली जात आहे. भारतीय वंशाच्या काही शीख कुटुंबांना मात्र वाघा बॉर्डरवरुन भारतात प्रवेश नाकारला आहे

पहलगाम हल्ल्यानंतर शेकडो भारतीय पाकिस्तानातून आले, शीख कुटुंबांचा रोखला प्रवेश, म्हणाले की दुबईत...!
| Updated on: Apr 27, 2025 | 3:02 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर देशात संताप व्यक्त होत आहे. भारताने आता पाकिस्तानबरोबर स्ट्रेटेजिक पावले उचलली आहेत. सिंधू नदीचे पाणी वाटप करार रद्द केला आहे. पाकिस्तानी व्हीसा रद्द केला आहे. तर पाकिस्तानातील भारतीयांना आता ते लोक परत पाठवत आहेत. परंतू त्यातही पाकिस्तान आता आपली हेकनी कायम ठेवली आहे. तेथील भारतीयांना बॉर्डरवरुन क्रॉस करताना अनेक चित्र अटी पाकिस्तानने घातल्या आहेत.

पाकिस्तानात आता 450 हून अधिक भारतीय नागरिक गेल्या तीन दिवसात वाघा बॉर्डरवरुन भारतात मायदेशी परतले आहेत. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थिती आणि व्हीसा रद्द झाल्यानंतर भारतीयांना आता आपल्या देशात परतणे भाग पडले आहे. शनिवारी तर २३ भारतात परत आले आहेत. हे पाकिस्तान सुपर लीग ( PSL ) 2025 शी संबंधित कर्मचारी होते. शनिवारी तर सीमा पार करणाऱ्या भारतीयांची एकूण संख्या अजून कळलेली नाही.

अतिरेक्यांच्या गोळीबारात २६ लोकांचा मृत्यू

गेल्या तीन दिवसात सुमारे १०० भारतीय लोक मायदेशी परतले आहे. शुक्रवारी तर ३०० भारतीय नागरिक वाघा बॉर्डरवरुन भारतात आले आहेत. शनिवारी २३ हून अधिक भारतीय आपल्या देशात परत आले आहेत.याच दरम्यान २०० पाकिस्तानी नागरीक देखील भारतातून पाकिस्तानात परतले आहेतत. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी दुपारपर्यंत अतिरेक्यांच्या गोळीबारात २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातून बहुतांश पर्यटक आहेत. केंद्र सरकारने या हल्ल्याचा कट सीमापार पाकिस्तानात शिजल्याचे समजल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचे सल्लागाराला निलंबित केले आहे. सिंधु पाणी वाटप करार रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर अटारी – वाघा बॉर्डर चौकी  तडकाफडकी बंद केली आहे.

शीख कुटुंबांना मात्र प्रवेश नाकारला

भारतीय वंशाच्या काही शीख कुटुंबांना मात्र वाघा बॉर्डरवरुन भारतात प्रवेश नाकारण्यात आला आहे. लोहार पासून सुमारे ८० किलोमीटर दूर ननकाना साहीब येथे राहाणाऱ्या भारतीय मूळ असलेल्या कॅनेडीयन शीख कुटुंबांना मात्र प्रवेश नाकारला आहे. त्यांना दुबईच्या मार्गे विमान प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गुरुवारी १०५ भारतीय आणि २८ पाकिस्तानी नारिकांना त्यांच्या-त्यांच्या देशात जाण्याची परवानगी दिली आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत