AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा मास्टरस्ट्रोक? होर्मुझ मार्ग बंद झाल्याने जागतिक अर्थव्यवस्था हादरणार, भारतावर काय परिणाम होणार?

भारत दररोज ५.५ दशलक्ष बॅरल तेल वापरतो. त्यातील १.५ दशलक्ष बॅरल तेल होर्मुझ जलमार्गातून येते. जगातील जवळजवळ एक चतुर्थांश तेल व्यापार या जलमार्गातून जातो. त्यामुळे जागतिक पातळीवर त्यांचे परिणाम होणार आहे.

इराणचा मास्टरस्ट्रोक? होर्मुझ मार्ग बंद झाल्याने जागतिक अर्थव्यवस्था हादरणार, भारतावर काय परिणाम होणार?
| Updated on: Jun 23, 2025 | 8:04 AM
Share

इराण आणि इस्त्रायल युद्धात अमेरिकने उडी घेतली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाची व्याप्ती वाढली आहे. आता इराणच्या संसदेने ‘होर्मुझ खाडी’ची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. कारण जागतिक आंतरराष्ट्रीय कच्चा तेलाची २० % निर्यात या मार्गावरुन होते. दर पाच लिटर तेलामागे एक लिटर तेल येथून पुरवले जाते. महिन्याला ३००० हून अधिक तेल आणि गॅस घेऊन जाणारी जहाजे या मार्गावरून जातात.

अंतिम निर्णयाचा अधिकार खमेनींवर

इराणच्या संसदेने निर्णय घेतला असला तरी अंतिम निर्णय इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांच्यावर सोडला आहे. इराणच्या या निर्णयाचा परिणाम केवळ मध्य पूर्वेतच नव्हे तर संपूर्ण जगातील तेलाच्या पुरवठ्यावर होणार आहे. म्हणजेच थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते होर्मुझ जलमार्ग बंद केल्याने आंतरराष्ट्रीय तेल पुरवठ्यावर सुमारे २०% परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १२० ते १३० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.

इराणलाही बसणार फटका

होर्मुझ जलमार्ग बंद करण्याचा सर्वात मोठा फटका इराणलासुद्धा बसणार आहे. कारण इराणचे कच्चे तेल या जलमार्गाद्वारे चीन, भारत आणि इतर आशियाई देशांना पुरवले जाते. तसेच इतर जे देश इराणकडून तेल खरेदी करतात त्यांनाही मोठा फटका बसेल. इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांनी संसदेच्या या निर्णयाला संमती दिली आणि होर्मुझ जलमार्ग बंद केला तर जागतिक अर्थव्यवस्था हादरणार आहे.

भारतावर काय होणार परिणाम?

होर्मुझ जलमार्ग हा भारतासाठी देखील खूप महत्वाचा आहे. कारण या जलमार्गातून दररोज मोठ्या प्रमाणात तेल भारतात पोहोचते. ते बंद झाल्यामुळे भारताचे नुकसान होऊ शकते. भारत दररोज ५.५ दशलक्ष बॅरल तेल वापरतो. त्यातील १.५ दशलक्ष बॅरल तेल होर्मुझ जलमार्गातून येते. जगातील जवळजवळ एक चतुर्थांश तेल व्यापार या जलमार्गातून जातो, जो आखाती देशांना हिंदी महासागराशी जोडतो.

Follow Us
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....