इराणचा जहाजावर मोठा हल्ला, जगात खळबळ, तब्बल इतक्या भारतीयांचा मृत्यु…

अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाले. मोठे हल्ले केली जात आहेत. अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या ठिकाणांवर इराणकडून हल्ला केला जात आहे. यादरम्यानच एक अतिशय धक्कादायक आणि खळबळ उडवणारी बातमी पुढे आली आहे.

इराणचा जहाजावर मोठा हल्ला, जगात खळबळ, तब्बल इतक्या भारतीयांचा मृत्यु...
Iran launches major attack
| Updated on: Mar 03, 2026 | 8:08 AM

इराण आणि अमेरिकेतील युद्ध पेटले आहे. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करत आहेत. इराण देखील थांबण्याचे नाव घेत नाही. इराणकडून मोठी हल्ले केली जात आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला, अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा मागील एक महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून आयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर लक्ष ठेऊन होती. आयातुल्ला अली खामेनेई यांचे लाईव्ह लोकेशन अमेरिकेकडे होते आणि त्यांच्या प्रत्येक बारीक हालचालीवर अमेरिका लक्ष ठेवत होती. युद्धाला सुरूवात झाली आणि सर्वात अगोदर अमेरिकेने आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार केले. त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर इराणकडून  सर्वोच्च नेते म्हणून अली रजा अराफी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे परिस्थिती अधिक बिकड होत आहे. दुबईत मोठी हल्ले केली जात आहेत. अनेक भारतीय लोक दुबईसह अनेक देशात अडकून पडली आहेत. त्यामध्येच आता धक्कादायक बातमी पुढे येत आहे.

इराण अमेरिका, इस्त्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धात इराणकडून ओमानच्या समुद्रामध्ये असलेल्या जहाजांवर हल्ला केला जात आहे. मोठी क्षेपणास्त्र थेट जहाजांवर टाकली जात आहेत. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, इराणकडून एका जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. त्यामध्ये तीन भारतीयांचा मृत्यु झाला. 20 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी आहेत.

ओमानमधील भारतीय दूतावासाने याबाबत माहिती दिली. दूतावासांनी सांगितले की, एमकेडी व्योममधील तीन भारतीयांचा मृत्यु झाला. ओमान प्रशासनाच्या मदतीने आम्ही भारतीयांना बाहेर काढण्याकरिता प्रयत्न करत आहोत. एमकेडी व्योम या जहाजावर मारशॅल आयलॅंडचा झेंडा लावलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर 21 लोकांना बाहेर काढण्यात यश आले. या जहाजावर भारतीय लोक कामाला होते.

ज्या 21 लोकांना बाहेर काढण्यात यश आले त्यापैकी 16 भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाली. भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याकरिता भारतीय दूतावासांकडून प्रयत्न केली जात आहेत. अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे.

Follow Us