AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जंतरमंतर येथे आंदोलकांची भेट घेऊन केंद्र सरकारवर तीव्र शब्दात हल्ला चढवला. लोकशाहीत जनतेशी संवाद साधणे आवश्यक असून, सध्याचे सरकार क्रूरपणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. "आज जे सत्तेत आहेत, त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ती काढायला जनतेला वेळ लागणार नाही," असा इशारा देत, सरकार हुकूमशाही वृत्तीने वागत असल्याचे ठाकरे म्हणाले.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 10:49 AM
Share

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत जंतरमंतरवर जाऊन अभिजीत दीपके यांची भेट घेऊन आंदोलकांशी संवाद साधला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एक गोष्ट स्पष्ट करतो, फक्त काल या आंदोलनाला पाठिंबा दिला असं नाही. पहिल्या दिवसापासून माझा आंदोलनाला पाठिंबा आहे. काल मी सर्वांना भेटायला आलो होतो. योगायोग म्हणजे राहुल गांधींनीही काल आंदोलन केलं. सरकार क्रूरपणे वागत आहे. ही लोकशाही नाही. आता लोक म्हणत आहेत की, यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते. आज जे सत्तेत आहेत, त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ही हवा काढण्यासाठी जनतेला वेळ लागणार नाही, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.

मी केवळ अभिजीत आणि इतर तरुणांना भेटायला आलो होतो. आता बघू पुढे काय करायचं आहे. जर कोणीही आंदोलन केलं तर सरकारने त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्यांचा काही संभ्रम असेल तर त्यांचा संभ्रम दूर केला पाहिजे. हे सरकारचं काम आहे. अभिजीत आणि सोनम वांगचुक यांच्याशी पहिल्याच दिवशी सरकारने चर्चा केली असती तर आज ही वेळ आली नसती.

तर ही लोकशाही नाही

मी यापूर्वी इंदिरा गांधी आणि अण्णा हजारे यांचं उदाहरण दिलं होतं. वांगचुक यांचे वडील उपोषणाला बसले होते. तेव्हा इंदिरा गांधी त्यांना भेटले होते. तर अण्णा हजारे यांना भेटायला तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव गेले होते. तुम्ही जबरदस्तीने तुमचं म्हणणं लादत असाल आणि लोकांचं म्हणणं ऐकत नसाल तर ही लोकशाही नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

राजीनामा मागण्यात गैर काय?

काल मी पाहिलं. 9 ते 10 वर्षाच्या मुली आणि महिलांशी ज्या पद्धतीने वागले, निश्चितच ही हिंदु संस्कृती नाही. हे रावण राज नाहीये. एक व्यक्ती महत्तावाचा आहे, की जनता महत्त्वाची आहे, हे कळलं पाहिजे. तसेच मंत्र्याचा राजीनामा मागत आहेत, त्यात गैर काय आहे? असा सवाल त्यांनी केला.

बोलायला कमीपणा वाटतो का?

या मुलांना आधाराची गरज आहे. हा आधारच तुम्ही तोडून मोडून टाकणार असाल तर ही हुकूमशाही आहे. तुम्ही लोकशाही मानत असाल तर त्यांच्याशी बोलायला कमीपणा का वाटावा? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..