मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर
मुंबईत मागील दोन दिवसांपासून पावसाचे थैमान पाहायला मिळाले. आता यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहेत.

मुंबईकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे . गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवार, दिनांक 21 जुलै 2026 सकाळी 6 ते बुधवार, दिनांक 22 जुलै 2026 सकाळी 6 या 24 तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 61.90% झाला आहे . गेल्या 24 तासात जलाशय साठ्यात 4.15 % वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या अधिकृत अहवालानुसार, तलावांमध्ये सातत्याने पाणी जमा होत असून हा वेग कायम राहिल्यास मुंबईत लागू असलेली पाणीकपात लवकरच मागे घेतली जाण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणी पुरवणारे मुख्य दोन तलाव जुलै महिन्यात ओसंडून वाहत आहेत. विहार तलाव आणि तुळशी तलाव ओसांडून वाहत आहे. 18 जुलै 2026 ला सात तलावांमध्ये 7 लाख 34 हजार 891 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता तर तो 20 जुलै 2026 रोजी 7 लाख 82 हजार 370 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. आता 22 जुलै, 2026 पर्यंत, एकूण पाणीसाठ 8 लाख 35 हजार 919 दशलक्ष लिटर झाला आहे, जो एकूण साठवण क्षमतेच्या 57.75% आहे. तुळसी आणि विहार हे दोन तलाव आधीच 100% क्षमतेने भरले आहेत. आता लवकरच इतर तलाव साठे ही भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुलै महिन्यात पावसाचा थैमान पाहायला मिळाला. आता जुलै महिना संपत आला आहे तरीही पावसाचा जोर कायम असल्याने हे तलावसाठे दुथडी भरुन वाहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंगळवार, दिनांक २१ जुलै २०२६ सकाळी ६ ते बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ सकाळी ६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ६१.९०% झाला आहे .
गेल्या २४ तासात जलाशय साठ्यात ४.१५ % वाढ झाली आहे. #MyBMCUpdates pic.twitter.com/AlABGfK7Ap
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 22, 2026
याशिवाय, पाणी शुद्धीकरण केंद्र असलेल्या भांडुप संकुल परिसरात गेल्या 24 तासांत 52 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर या हंगामातील एकूण पर्जन्यमान आता 2006 मिमीवर पोहोचले आहे. हवामान खात्याने आगामी काही दिवसांतही पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असल्याने इतर प्रमुख धरणांमधील साठ्यातही वेगाने वाढ होण्याची अपेक्षा नाकारता येत नाही.
कोणत्या तलावात सध्या किती पाणीसाठा?
- अप्पर वैतरणा – 72,209 (36.41%)
- मोडक सागर – 1,02,000 (83.18%)
- तानसा- 1,22,404 (93.22%)
- मध्य वैतरणा- 90,528 (50.21%)
- भातासा – 3,35,495 (57.17%)
- विहार- 27,698 (100%)
- तुळशी – 8,046 (100%)
