Ayatollah Ruhollah Khomeini: खोमेनीचं भारताशी असं खास कनेक्शन, उत्तर प्रदेशातील या गावाशी काय संबंध?

Supreme Leader Ayatollah Ruhollah Khomeini: अमेरिका-इस्त्रायलयच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी हे त्यांच्या कुटुंबियांसह ठार झाले. इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पण खोमेनींचं भारतीय कनेक्शन अनेकांना माहिती नाही. ते मूळचे भारतीय होते हे सांगूनही अनेकांना विश्वास बसणार नाही.

Ayatollah Ruhollah Khomeini: खोमेनीचं भारताशी असं खास कनेक्शन, उत्तर प्रदेशातील या गावाशी काय संबंध?
अयातुल्ला खोमेनी
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 01, 2026 | 8:48 AM

Khomeini Connection with Kintur Uttar Pradesh: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी हे इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला दुजोरा दिला आहे. तर इराणच्या सरकारी वाहिनीने सुद्धा त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सुप्रीम लीडरच्या मृत्यूनंतर देशात 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर 7 दिवसांची सुट्टीी जाहीर करण्यात आली आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात खोमेनींच्या कुटुंबातील सर्वांचाच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. जगातील एक क्रूर नेता ठार झाल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे.पण खोमेनी यांचे पूर्वज हे भारतीय असल्याचे अनेकांना माहिती नाही. उत्तर प्रदेशातील किन्तूर या गावाचे खोमेनी कुटुंब आहे. एका छोट्या गावातून थेट एका देशाचा सर्वोच्च नेता कसा होता खोमेनींचा प्रवास?

इस्लामिक क्रांतीनंतर अनेक बंधनं

इराणमध्ये 1978 मध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्यापूर्वी या देशावर युरोपचा मोठा प्रभाव होता. हा देश कट्टरतेकडे झुकलेला नव्हता. लोकांना खोमेनींच्या इस्लामिक क्रांतीचे मोठा आकर्षण होते. पण क्रांती झाल्यावर या देशात महिलांवर आणि पुरुषांवर अनेक बंधनं आली. काही चांगल्या बाबी झाल्या. पण दडपशाही आणि धार्मिक कट्टरतवादाने नागरिकांच्या मुक्त जगण्याचा अधिकार हिरावला. याविरोधात अनेकदा आंदोलनं झाली. पण खोमेनी यांनी ही आंदोलनं अत्यंत क्रूरपणे चिरडली. अनेक लोकांना सार्वजनिकरित्या फासावर लटकवले गेले. सांस्कृतिक पोलिसिंगद्वारे अनेक क्रूर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. 2012 पासून पुन्हा अनेक तरुणींनी स्वातंत्र्यासाठी मोठी आंदोलनं केली. खोमेनी यांच्याविरोधात स्त्रीया मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या.

भारताच्या किन्तूरशी असा थेट संबंध

1978 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली.ती रुहुल्लाह खामेनी यांनी घडवून आणली. ते अयातुल्ला खोमेनी यांचे वडील होते. तर त्यांचे आजोबा अहमद मूसवी हे उत्तर प्रदेशातील बाराबंकी या जिल्ह्यातील किंतूर या गावाचे रहिवाशी होते. त्यांचे किंतूर हे जन्मगाव आहे. सिरोलीगौसपूर तहसील अंतर्गत किंतूर हे गाव सय्यद अहमद मुसवी यांचे मूळ गाव आहे. वयाच्या 40 व्या वर्षी ते पहिल्यांदा धार्मिक यात्रेसाठी इराक दौऱ्यावर गेले. तिथून ते जवळच्याच इराणमध्ये गेले. इराणमधील खुमेन या गावातच ते स्थायिक झाले. अहमद मूसवी यांनी त्यांच्या नावाला उपनाव जोडले. इराणचे लोक त्यांना सय्यद अहमद मूसवी असे म्हणू लागले.

भारतीय वंशाचा व्यक्ती इराणचा सुप्रीम लीडर

या मूसवी यांचा नातू रुहुल्लाह खामेनी याचा जन्म 1902 मध्ये झाला होता. रुहुल्लाह म्हणजे अयातुल्ला खोमेनी यांचे वडील आहेत. रुहुल्लाह यांनी धार्मिक आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. इराणमध्ये त्यावेळी पहलवी कुटुंबाचे शासन होते. खामेनी यांनी या घराण्याला विरोध सुरू केला. पहलवीने त्याला देशाबाहेर हाकलले. पण इराणमधील जनता रुहुल्लाह खामेनी याला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरली. बंडाळी वाढत गेली. गृहयुद्ध भडकले. पहलवी कुटुंब देश सोडून पळून गेले. 14 वर्षानंतर खामेनी इराणमध्ये परतले. 1979 मध्ये पहिल्यांदा इस्लामिक सरकार अस्तित्वात आले. रुहुल्लाह खामेनी इराणचे पहिले सर्वोच्च नेते ठरले.

अयातुल्ला खामेनींची मजबूत पकड

1989 मध्ये रूहुल्‍लाह खामेनी यांच्या निधनानंतर अयातुल्ला अली खामेनी सत्तारूढ झाले. पद मिळताच त्याने धार्मिक कट्टरतवाद सुरू केला. त्यांनी इराणच्या घटनेत मोठ्या दुरस्त्या केल्या. इराणवर मजबूत पकड मिळवण्यासाठी त्याने अनेक सांस्कृतिक, धार्मिक बंधन घातली. धार्मिक हुकूमशाही आणण्यात अयातुल्ला खामेनी यशस्वी ठरला. इराणवर आपला वचक असावा ही त्यांच्या वडिलांची इच्छा अयातुल्ला खोमेनी यांनी अखेर पूर्ण केली. पण हा अतिरेकी तिथल्या जनतेला अजिबात मान्य झाला नाही. त्यांनी वेळोवेळी त्याविरोधात आवाज उठवला.

Follow Us