AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

israel hamas war | हमासविरोधात लढाईसाठी इस्रायलचे 3 लाख सैन्य सज्ज, परंतू या गोष्टीच्या टंचाईने अडचण

सध्या संपूर्ण इस्रायल युद्धाच्या तयारीत जुंपला आहे. पुरुष आणि महिलांना इमर्जन्सी अंतर्गत सैन्यात सामील केले जात आहे. परंतू सैनिकांना आणि इस्रायली नागरिकांना अनेक वस्तूंची टंचाई जाणवत आहे.

israel hamas war | हमासविरोधात लढाईसाठी इस्रायलचे 3 लाख सैन्य सज्ज, परंतू या गोष्टीच्या टंचाईने अडचण
israel troopsImage Credit source: socialmedia
| Updated on: Oct 21, 2023 | 6:31 PM
Share

तेल अवीव | 21 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमासचा संघर्ष ( israel hamas war ) एका निर्णायक वळणावर पोहचला आहे. लवकरच हमासच्या निकाल लावण्यासाठी गाझापट्टीत इस्रायलची सैन्य शिरणार आहे. परंतू इस्रायलच्या समोर एक अडचण निर्माण झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये बुलेटप्रुफ जॅकेट आणि अन्य संरक्षक साहित्याची टंचाई निर्माण झाली आहे. बुलेटप्रुफ कंपन्यांनी सध्याची देशातील बुलेटप्रुफ जॅकेटची मागणी पूर्ण करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे.

सध्या संपूर्ण इस्रायल युद्धाच्या तयारीत जुंपला आहे. पुरुष आणि महिलांना इमर्जन्सी अंतर्गत सैन्यात सामील केले जात आहे. त्यांच्याकडे आवश्यक साधने उपलब्ध नसल्याचे योव डोटन यांनी म्हटले आहे. हळूहळू आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात आहे. केवळ सैनिकांच बुलेटप्रुफ जॅकेट आणि हेल्मेटची गरज नसून नागरिकांनाही त्याची गरज आहे. मागणी प्रचंड आहे आणि पुरवठा खूपच कमी आहे. इस्रायलने ही लढाई त्यांच्या अस्तित्वाची लढाई केली असून हे युद्ध खूप दिवस चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या देश मोठ्या लढाईची तयारी करीत आहे. हे युद्ध ज्यू लोकांच्या अस्तित्वाची लढाई असून आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी साल 1948 नंतर हा इस्रायलसाठी सर्वात महत्वाचा काळ आहे. इस्रायलमध्ये केव्हा कुठेही हल्ला होऊ शकतो. त्यामुळे येथील प्रत्येक नागरिक आपल्या कुटुंबांसाठी बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी करीत असतो. कारण भौगोलिकदृष्ट्या हा देश चारी बाजूंनी शत्रूंनी घेरलेला आहे.

डोटन यांनी सांगितले की देशाला विविध ठीकाणावरुन मदत मिळत आहेत. इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी भारताचे देखील आभार मानले आहेत. आम्हाला दानात अनेक वस्तू मिळत आहेत. जगभरातून अनेक वस्तू मिळत आहेत. सैनिकांसाठी जेवण, मोजे, कपडे पाठवित आहेत. प्रत्येक जण आपल्या परीने मदत करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही मदतीची जाण ठेवणार

जगभरातून आमचे मित्र आम्हाला वस्तू पाठवित आहेत. खासकरुन भारतातून आम्हाला मदत मिळत आहेत. आम्ही भारताचे केवळ युद्धकाळातील नव्हे तर खूप आधीपासून असलेल्या मैत्री बद्दल आभार मानीत आहे. आम्हाला गरज असताना कोण आमच्या मदतीला धावून आले हे आम्ही लक्षात ठेवणार आहोत असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, इस्रायल सैन्याने युद्ध लढण्यासाठी तीन लाख रिझव्ह सैन्य जमा केले आहे. त्यातली प्रत्येक सैनिकाला सुरक्षा कवच प्रदान केले असल्याचे आयडीएफचे प्रवक्ता मार्कस शेफ यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.