AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालदीव सरकारला त्यांच्याच लोकांनी फटकारलं, पाहा भारताबाबत काय म्हणाले

India Maldives Relation : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यासाठी सरकारने त्यांच्याच उपमंत्र्यांना निलंबित केले आहे. यावेळी मालदीवमधील लोकांनीच त्यांच्या सरकारवर टीका केली आहे. मालदीवच्या दोन माजी राष्ट्राध्यक्ष आणि माजी उपराष्ट्राध्यक्षांनी भारताबाबत ही वक्तव्य केले आहे.

मालदीव सरकारला त्यांच्याच लोकांनी फटकारलं, पाहा भारताबाबत काय म्हणाले
| Updated on: Jan 09, 2024 | 5:07 PM
Share

India Maldives row : भारतीय उच्चायुक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप बाबतच्या पोस्टवर केलेल्या “अपमानजनक” टिप्पण्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मालदीव सरकारने आपल्या तीन उपमंत्री मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान यांना निलंबित केले. भारताच्या बाजुने अनेक जण उभे राहिले आहेत. मालदीव सरकारने या आक्षेपार्ह विधानांपासून स्वतःला दूर केले आहे. मालदीव सरकारने ही वैयक्तिक मते असल्याचे म्हटले आहे. या वादग्रस्त टिप्पण्यांचा मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष, माजी उपराष्ट्राध्यक्ष, माजी परराष्ट्र मंत्री आणि काही उद्योगपतींनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलिह यांनी ट्विट केले- ‘मी द्वेषपूर्ण भाषेचा निषेध करतो, भारत मालदीवचा चांगला मित्र आहे’

मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी ट्विट केले की, “मालदीवच्या सरकारी अधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर भारताविरोधात द्वेषपूर्ण भाषेचा वापर करण्यात आल्याचा मी निषेध करतो. भारत हा नेहमीच मालदीवचा चांगला मित्र आहे आणि आम्ही अशा कठोर टिप्पण्या खपवून घेणार नाही.’

माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी ट्विट केले की, ‘मालदीवच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रमुख मित्रपक्षाच्या नेत्यासाठी मरियम शिउना यांनी अशी वाईट भाषा वापरली होती. मालदीव सरकारने या टिप्पण्यांपासून दूर राहावे. मालदीव सरकारने भारताला आश्वासन द्यावे की यातून सरकारचे विचार दिसून येत नाहीत.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही मालदीवच्या उपमंत्र्यांच्या अपमानास्पद ट्विटवर संताप व्यक्त केला आहे. यावर मालदीवचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अहमद अदीब म्हणाले, ‘मी मंत्री असताना अनेक बॉलिवूड कलाकारांचे स्वागत केले. ते आमच्यात सामील झाले आणि आम्हाला मालदीव आता जिथे आहे तिथे तयार करण्यात मदत केली. त्यांना आमच्या विरोधात भाष्य करावे लागले अशा परिस्थितीत आम्ही आलो हे अतिशय दुःखद आहे. कोविडनंतर भारतीय पर्यटकांनीच मालदीवच्या पर्यटन उद्योगाला खरोखरच वाचवले आहे.

मालदीवचे माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘हा मेसेज सध्याच्या मालदीव सरकारच्या दोन उपमंत्र्यांनी आणि सत्ताधारी आघाडीतील एका राजकीय पक्षाच्या सदस्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल मीडियावर केला आहे. हे विधान निषेधार्ह आणि घृणास्पद आहे. या अधिकाऱ्यांना फटकारण्याची मी सरकारला विनंती करतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.