AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरपाई द्या, भारत, चीन आणि अमेरिका विरोधात नेपाळची UN मध्ये धाव, थेट..

नेपाळमध्ये मोठा पूर झाला. या पुरात हजारो लोक वाहून गेली. त्यातच आता अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. नेपाळने स्पष्ट म्हटले की, आम्हाला मदत नको, आम्हाल भरपाई द्या. यासोबतच त्यांनी भारत, चीन आणि नेपाळवर गंभीर आरोप केली.

भरपाई द्या, भारत, चीन आणि अमेरिका विरोधात नेपाळची UN मध्ये धाव, थेट..
Balen Shah
| Updated on: Sep 03, 2026 | 4:34 PM
Share

नेपाळमध्ये 26 ऑगस्ट 2026 रोजी मोठा पूर आला. या पुराने एकच थैमान घातले. या पुरात तब्बल 1204 लोकांचा जीव गेला. यासोबतच 4216 लोक बेपत्ता आहेत. काही प्रेत भारतातही वाहून आली. अजूनही लोकांचा शोध सुरू आहे. नेपाळमधील पुराच्या घटनेनंतर भारताने मोठी मदत नेपाळमध्ये पाठवली. नेपाळमध्ये मदत पाठवणारा पहिला देश भारत होता. भारतासोबतच अन्य देशांनी नेपाळला मदत केली. सुरूवातीला ज्यावेळी भारताने नेपाळला बचावकार्यात मदत करण्याचा प्रस्ताव दिला, त्यावेळी नेपाळने ती मदत नाकारली.नेपाळने मदत नाही तर भरपाई द्या अशी मागणी केली. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी रसुवामधील भोटेकोशी नदीवरील पूर हा जलवायू परिवर्तनाने झाल्याचे म्हटले. यासोबतच हिमालयी क्षेत्रातील जलवायू मोठे आव्हान असल्याचे त्यांनी म्हटले.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी हिमालयाचे तापमान 1.8 डिग्री सेल्सिअस असल्याचे म्हटले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही घटना बर्फ आणि पर्वताचा भाग उंचीवरून पडल्याने झाली. पंतप्रधानांनी म्हटले की, सरकारचे लक्ष शोध मोहिम, बचावकार्य आणि लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यावर केंद्रीत आहे. दुसरीकडे त्यांनी जलवायूच्या संकटापासून वाचण्यासाठी मदत नाही तर भरपाई मागितली आहे.

भारत, चीनचे नाव घेत त्यांनी भरपाई मागितली. काठमांडूचा इरादा इतका जास्त पक्का आहे की, त्यांनी थेट याची भरपाई मागण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचावर धाव घेतली. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी संयुक्त राष्ट्र महासभा अर्थात (UNGA) मध्ये हे प्रकरण पाठवत आहेत. यासाठी खास योजनाही त्यांच्याकडून तयार केली जातंय. नेपाळचे विदेशमंत्री शिशिर खनाल यांनी याकरिता तीन देशांना जबाबदार धरले आहे.

त्यात भारत, चीन आणि अमेरिका यांचा समावेश आहे.  या हवामानविषयक आपत्तीचा सामना करण्यासाठी नेपाळने मदतीऐवजी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. चीन, भारत आणि अमेरिका या देशांकडून ही मागणी करण्यात आली आहे, कारण हे देश हरितगृह वायूंचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या जगातील प्रमुख देशांपैकी आहेत, असे नेपाळचे म्हणणे आहे. त्यांनी रशियाकडेही मदत मागितली.

Follow Us
कोकणवासीयांसाठी मोठी गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी रेल्वे सेवा सुरू
कोकणवासीयांसाठी मोठी गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी दैनंदिन रेल्वे सेवा सुरू; गणेशोत्सवाआधी मोठा दिलासा
आदित्य ठाकरे भेटीसाठी आले असतानाचा आंदोलक... 'त्या' व्हिडीओमध्ये नेमकं
आदित्य ठाकरे भेटीसाठी आले असतानाचा आंदोलक... 'त्या' व्हिडीओमध्ये नेमकं काय?
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला... एकनाथ शिंदेंची एका वाक्यातच...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला... एकनाथ शिंदेंची एका वाक्यातच प्रतिक्रिया
पाऊस नाही, पण कांद्याला भाव भारी! धुळ्यात 4,000 ते 4,500 पार
Dhule | पाऊस नाही, पण कांद्याला भाव भारी! धुळ्यात 4,000 ते 4,500 पार; विहिरीच्या पाण्यावरच...
महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम कोणी केलं असेल तर...
Arvind Sawant | महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम कोणी केलं असेल तर... अरविंद सावंतांचा शिंदे गटावर थेट हल्ला
कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापटांवर हल्ला करणारा संतोष चव्हाण अटकेत
Vidyanand Bapat | कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापटांवर हल्ला करणारा संतोष चव्हाण अटकेत
मोठी खळबळ! रात्रीच्या सुमारास अचानक... भाजप नेत्याच्या वाहनाची तोडफोड,
मोठी खळबळ! रात्रीच्या सुमारास अचानक... भाजप नेत्याच्या वाहनाची तोडफोड, व्हिडिओ आला समोर
गरिबांच्या लेकरांचा घास चोरला... पेपरफुटीवर तरुणाची हृदयस्पर्शी कविता
Suyog Rajnekar | गरिबांच्या लेकरांचा घास चोरला जातोय! MPSC पेपरफुटीवर तरुणाची हृदयस्पर्शी कविता व्हायरल; रोहित पवारांनीही केली शेअर
1994पासून आजपर्यंत काय करताय? मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं स्पष्ट...
1994पासून आजपर्यंत काय करताय? मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं स्पष्ट मत, एका विधानानेच...
21व्या वर्षात संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी...
ठाण्यात आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी विश्वविक्रमासाठी सज्ज