AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Attack Mastermind : इंशाअल्लाह ये दरिया भी हमारे होंगे, इनके डैम भी…पहलगामच्या मास्टरमाइंडची भारताला पुन्हा धमकी

Pahalgam Attack Mastermind : “इंशाअल्लाह.. दरिया, डॅम, कश्मीर सबकुछ हमारे होंगे” सैफुल्लाह कसूरीचे हे शब्द ऐकून असं वाटतय, त्याने आपल्यासोबत हाफिजला सुद्धा समुद्रात बुडवण्याच स्वप्न पाहिलय.

Pahalgam Attack Mastermind : इंशाअल्लाह ये दरिया भी हमारे होंगे, इनके डैम भी...पहलगामच्या मास्टरमाइंडची भारताला पुन्हा धमकी
safiullah kasuri
| Updated on: Sep 19, 2025 | 9:29 AM
Share

पहलगामचा मास्टरमाइंड दहशतवादी सैफुल्लाह कसूरीने PM मोदींच नाव घेऊन भारताला धमकी दिली आहे. “इंशाअल्लाह.. दरिया, डॅम, कश्मीर सबकुछ हमारे होंगे” सैफुल्लाह कसूरीचे हे शब्द ऐकून असं वाटतय, त्याने आपल्यासोबत हाफिजला सुद्धा समुद्रात बुडवण्याच स्वप्न पाहिलय. सैफुल्लाह कसूरी सुद्धा पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड पैकी एक आहे. ‘इंशाअल्लाह’ बोलून त्याने सिंधु नदी आणि जम्मू-कश्मीरवरुन भारताला धमकी देण्याची हिम्मत केलीय. सैफुल्लाह कसुरीने भारताने निलंबित केलेला सिंधु जल करार आणि जम्मू-काश्मीवरुन गरळ ओकली.PM मोदी यांचं नाव घेऊन भारताला धमकी देण्याची चूक केली. सैफुल्लाह म्हणाला की “ती वेळ जवळ येतेय. इंशाअल्लाह हे समुद्र आमचे असणार. यांचे डॅम सुद्धा आमचे असतील. हे सर्व जम्मू-कश्मीर आमचं असेल आणि भारताला किंमत चुकवावी लागेल”

‘पाकिस्तानची सुरक्षा कशी करायची हे आम्हाला माहित आहे. शत्रुशी बदला घेणं सुद्धा आम्हाला येतं’ असं सैफुल्लाह म्हणाला. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारतीय सैन्य दलांनी मुरीदकेमधील लश्करच हेडक्वार्टर उद्धवस्त केलं. 7 मे रोजी भारताच्या ब्राह्मोस मिसाइलने लष्करचे अनेक दहशतवादी मारले. पहलगामचा हिशोब चुकवावा लागणार हे भारताने स्पष्ट केल्यानंतर सैफुल्लाह कसूरी हा तोच दहशतवादी आहे, जो बोललेला माझा या हल्ल्याशी संबंध नाही.

त्याचा शेवट 100 दहशतवाद्यांसारखाच होईल

ऑपरेशन सिंदूरनंतर एक गोष्ट स्पष्ट आहे, यापुढे पाकिस्तानच्या कुठल्याही हल्ल्याला असच प्रत्युत्तर दिलं जाईल. दहशतवादी सैफुल्लाह कसूरीने आपल्या विद्धवंसाची SCRIPT स्वत: लिहिली आहे. सैफुल्लाहने आपले शब्द खरे करुन दाखवण्याचा विचार जरी केला, तरी त्याचा शेवट 100 दहशतवाद्यांसारखाच होईल, जे ऑपरेशन सिंदूरच्यावेळी मारले गेले.

भारताकडे दयेची भीक मागितलेली

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाच वातावरण होतं. बदला घेण्याची मागणी सुरु होती. सैन्याने दहशतवाद्यांवर प्रहार करण्याची पूर्ण तयारी केलेली. सरकार आपल्या पातळीवर योजना बनवत होती. त्यावेळी भयभयीत सैफुल्लाह कसूरी बरोबर दोन दिवसांनी क्षमा याचना करत होता. पहलगाम हल्ल्याशी आपला संबंध नाही असं तो म्हणत होता. सैफुल्लाहने त्यावेळी भारताकडे दयेची भीक मागितलेली.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.