AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेजारी देशांमध्ये संघर्ष पेटला? पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भीषण हल्ला, 34 जणांचा मृत्यू

pakistan attack afghanistan : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात 34 जणांचा मृत्यू झाला.

शेजारी देशांमध्ये संघर्ष पेटला? पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भीषण हल्ला, 34 जणांचा मृत्यू
| Updated on: Jun 29, 2026 | 8:27 AM
Share

इराण-अमेरिकेमध्ये पुन्हा संघर्ष भडकण्याची चिन्ह दिसत असताना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही तणाव वाढला आहे. ४ सैनिकांच्या मृत्यूचं प्रत्युत्तर म्हणून केलेल्या हल्ल्यात अफगाणिस्तानातील 34 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने मध्यरात्री उशिरा केलेल्या हल्ल्याने खळबळ माजली आहे. अफगाणिस्तानच्या सीमेवर हा हल्ला करण्यात आला, त्यात 34 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी हल्ल्याला दुजोरा दिला आहे.

पाकिस्तानच्या सैन्य दलाने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर ठरवून हल्ले केले. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, कराचीतील पाकिस्तानी रेंजर्स कँपवर हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवर हल्ले केले.

पाकिस्तानी सैन्याच्या दाव्यानुसार, अफगाणिस्तान हल्ले करून दहशतवाद्यांचे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा नष्ट केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केलाय. पाकिस्तानने अनेकदा अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले आहेत. अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारने तहरीक-ए-तालिबान या पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे. पाकिस्तानातील सर्व हल्ले याच दहशतवादी संघटनेने केले आहेत. या दहशतवादी संघटनेला पाठिंबा, संरक्षण, मदत करण्याचं काम अफगाणिस्तानचं तालिबानी सरकार करत असल्याचा आरोप आहे. पाकिस्तानने याच दहशतवादी संघटनेविरोधात लष्करी कारवाईचा धडाका लावला आहे.

पाकिस्तान सैन्याने सूत्रांच्या माहितीच्या आधारावर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमाभागात ऑपरेशन राबवलं. त्यानंतर अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांत, पक्तिका प्रांत आणि कुनार प्रांतातील ३ दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्यात ४ सैनिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेशी संबंधित असलेल्या जमात-उल-अहरार या संघटनेने स्वीकारली होती.

दहशतवादी संघटनेने पाकिस्तानच्या सिंध रेंजर्सच्या मुख्यालयावर हल्ला करण्यात आला होता. त्यात ४ जणांचा मृत्यू झाला होता. कराचीमधील सर्वात सुरक्षित भाग असलेल्या ठिकाणी हा हल्ला झाल्याने लोकांमध्ये भीतीचं वातवरण पसरलं होतं. दहशतवाद्यांनी मुख्यालयात घुसून गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले केले. त्यावेळी केलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्याने ६ हल्लेखोरांना ठार केले होते.

Follow Us
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी