AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नकोच हा देश… अर्ध्याहून अधिक पाकिस्तानी तरुणांना देश सोडून जायचंय; अहवालातील धक्कादायक माहिती

पाकिस्तानातील पीआयडीई या संस्थेने एक धक्कादायक माहिती दिली आहे. या संस्थेच्या सर्व्हेनुसार पाकिस्तानातील अर्ध्याहून अधिक तरुणांना देश सोडून जायचं आहे. पुरेशा संधी नाहीत आणि महागाईचा आगडोंब यामुळे या तरुणांना देश सोडून जायचं आहे.

नकोच हा देश... अर्ध्याहून अधिक पाकिस्तानी तरुणांना देश सोडून जायचंय; अहवालातील धक्कादायक माहिती
pakistani youthImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 14, 2023 | 2:09 PM
Share

कराची : आर्थिक संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे. पाकिस्तानमध्ये आर्थिक चणचण निर्माण झाल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. हाताला काम नाही. त्यातच धार्मिक तंटे बखेडे सुरूच आहे. हे कमी काय, येथील सरकार ही अस्थिर आहे. त्यामुळे पाकिस्तानी तरुण हवालदिल झाले आहेत. या तरुणांना आता आपल्याच देशाचा तिटकारा आला आहे. पाकिस्तानमध्ये राहणं नकोच असं हे तरुण म्हणत आहेत. एका सर्व्हेतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व्हेनुसार 67 टक्के तरुणांना हा देश सोडून जायचा आहे. मागच्या सर्व्हेत हा आकडा 62 टक्के इतका होता.

पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हल्पमेंट इकॉनॉमिक्स ( पीआयडीई)ने हा सर्व्हे केला आहे. या संस्थेचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. फहीम जहांगीर खान यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चांगल्या संधीसाठी देशातील 67 टक्के तरुणांना देश सोडून जावसं वाटतंय. पाकिस्तानमध्ये 31 टक्के शिकलेले तरुण बेरोजगार आहेत, असं खान यांनी सांगितलं. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर इकोनफेस्ट या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या दोन दिवसीय चर्चासत्रात फहीम खान यांनी हे मत मांडलं.

विद्यापीठातून फक्त डिग्र्या मिळतात

सरकारने समस्येतून मार्ग काढण्यासाठी तरुणांच्या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. पाकिस्तानात 200 हून अधिक विद्यापीठे आहेत. या विद्यापीठातून दरवर्षी हजारो विद्यार्थी पदव्या घेऊन बाहेर पडत आहेत. पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीये. कारण डिग्री म्हणजे रोजगाराची हमी नाही. कारण या तरुणांकडे स्किल्स नाहीये. कंपन्या मात्र स्किल्सबाबत विचारणा करत आहे. त्यामुळे शिक्षकांसह सरकारनेही या समस्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं खान यांनी सांगितलं.

या तरुणांना देश सोडायचाय

15 ते 24 वर्ष वयाच्या तरुणांमध्ये पाकिस्तान सोडून जाण्याची तीव्र इच्छा आहे. देशाची आर्थिक स्थिती चांगली नाही. तसेच देशात संधी नाहीये. त्यामुळे या तरुणांना देश सोडून जायचा आहे, असं सर्व्हेत नमूद करण्यात आलं आहे. पाकिस्तान सध्या एका विचित्र परिस्थितीत आहे. आम्ही नोकरीसाठी मुलाखती घेतो. पण योग्य उमेदवार मिळत नाही. दुसरीकडे योग्य उमेदवारांना रोजगार मिळत नाही, अशी दुहेरी विचित्र परिस्थिती आहे. शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांना आवश्यक ते शिक्षण दिलं जात नाही. प्रत्येक वर्षी त्याच त्याच जुन्या नोट्स देऊन काम भागवलं जात आहे, असं ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. दुर्रे नायब यांनी सांगितलं.

Follow Us
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......