AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! पुढील 17 दिवस पाकिस्तानसाठी धोक्याचे?; पाकच्या बड्या नेत्याची भविष्यवाणी काय?

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान भीतीच्या सावटाखाली आहे. पाकिस्तानी नेते नदीम मलिक यांनी पुढील 17 दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे आणि युद्धविराम असूनही तणाव कायम आहे. पाकिस्तानच्या सैन्याने प्रचार करून वास्तव लपवण्याचा प्रयत्न केला आहे, पण भीती मात्र खऱ्या आहे.

मोठी बातमी ! पुढील 17 दिवस पाकिस्तानसाठी धोक्याचे?; पाकच्या बड्या नेत्याची भविष्यवाणी काय?
pakistan leader nadeem malikImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2025 | 1:30 PM
Share

भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं आहे. पाकिस्तानकडून भारताला कडाडून उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हा प्रयत्न पाकिस्तानच्याच अंगलट आला. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या एअरबेसचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या सैन्याशी संबंधित 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक अतिरेकी ठार झाले आहेत. यात अनेक खतरनाक अतिरेक्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पाकिस्ताने भारतासोबत शस्त्रसंधी केली. पण अजूनही पाकिस्तानला भारताची भिती वाटत आहे. भारत केव्हाही आपल्यावर हल्ला करू शकतो असं पाकिस्तानला वाटत आहे. पाकिस्तानच्या एका बड्या नेत्यानेच ही भीती आणि भविष्यवाणीही केली आहे.

पाकिस्तानचे न्यूज चॅनल समा टीव्हीवरील एका कार्यक्रमात अवामी मुस्लिम लीगचे प्रमुख आणि माजी मंत्री नदीम मलिक यांनी ही भीती आणि भविष्यवाणी व्यक्त केली आहे. मेचा महिना अत्यंत महत्त्वाचा असेल. खासकरून पुढचे 17 दिवस. कारण युद्धविराम झाल्यानंतरही तणाव कायम आहे. येत्या 17 दिवसात भारत पुन्हा पाकिस्तानचं टेन्शन वाढवू शकतो. भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. लढाई अजूनही संपलेली नाही, असं नदीम मलिक यांनी म्हटलं आहे.

सतर्क राहावं लागेल

पाकिस्तानला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण तणाव वाढण्याच्या शक्यतेला नाकारता येत नाही, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानी सैन्याने चालवलेल्या अपप्रचाराचीच री ओढली. पाकिस्तानने भारताच्या पाचहून अधिक विमानांना पाडलं आहे, असं सांगतानाच युद्ध संपलेलं नाही. फक्त युद्धविराम लागू आहे, असं मलिक म्हणाले.

पाकिस्तान अधिकच घाबरला

पाकिस्तानी नेत्यांना भारताच्या हल्ल्याची भीती नवीन गोष्ट नाही. पहलगाम येथील हल्ल्यानंतर दोन आठवड्यापर्यंत पाकिस्तान भीतीच्या सावटाखाली होता. भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानची ही भीती वास्तवात आणली. भारताने या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानच्या अतिरेक्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. 100 हून अधिक दहशतवादीही ठार केले.

त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाइलने हल्ला केला. त्यानंतर भारतानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाइल हल्ले परतवून लावले. सध्या दोन्ही देशात शस्त्रसंधी लागू आहे. पण तरीही पाकिस्तानी नेते आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...