Pakistan Political Crisis : पाकिस्तानमध्ये सत्तेचा ‘एप्रिल फुल’, याच महिन्यात सर्वाधिक सरकारे कोसळली; पाहा विशेष रिपोर्ट

Pakistan Political Crisis : पाकिस्तानात पुन्हा एकदा लोकांनी निवडून दिलेलं सरकार अल्प काळात कोसळलं आहे. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आणि तो जिंकल्याने इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार व्हाव लागलं आहे.

Pakistan Political Crisis : पाकिस्तानमध्ये सत्तेचा 'एप्रिल फुल', याच महिन्यात सर्वाधिक सरकारे कोसळली; पाहा विशेष रिपोर्ट
पाकिस्तानमध्ये सत्तेचा 'एप्रिल फुल', याच महिन्यात सर्वाधिक सरकारे कोसळलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 11:36 AM

लाहोर: पाकिस्तानात (pakistan) पुन्हा एकदा लोकांनी निवडून दिलेलं सरकार अल्प काळात कोसळलं आहे. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव (no trust vote) आणला आणि तो जिंकल्याने इम्रान खान (imran khan) यांना सत्तेतून पायउतार व्हाव लागलं आहे. अविश्वास ठराव जिंकता न आल्याने इम्रान खान यांचं पंतप्रधानपद गेलं आहे. सत्ता जाणार असल्याची कुणकुण लागल्याने इम्रान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी त्यांचा ट्विटरवरचा बायोही बदलला होता. त्यामुळे पाकिस्तानला नवा पंतप्रधान मिळणार आहे. पाकिस्तानच्या 75 वर्षाच्या इतिहासात 23 वा पंतप्रधान मिळणार आहे. मात्र, या निमित्ताने एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. एप्रिल महिना हा पाकिस्तानातील राजकारण्यासाठी अनलकी मानला जात आहे. पाकिस्तानात इम्रान खान यांची सत्ताही एप्रिलमध्येच गेली आहे. त्यामुळे एप्रिल महिना आणि पाकिस्तानातील सत्ता जाणं याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

एप्रिल आणि ऑक्टोबर अनलकी

ऑक्टोबरनंतर एप्रिल महिनाही पाकिस्तानातील राजकारणात अनलकी मानला जात आहे. पाकिस्तानच्या 75 वर्षाच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी कार्यकाळ पूर्ण केला नाही. 22 पैकी 4 पंतप्रधानांना ऑक्टोबर आणि एप्रिल महिन्यातच आपलं पद गमवावं लागलं आहे. इम्रान खान यांच्या सत्तेतून पायउतार होण्यापूर्वी ऑक्टोबर महिना अनलकी मानला जात होता. कारण त्या महिन्यात चार पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. तर एप्रिल महिन्यात तीन पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला आहे. आता इम्रान खान यांनाही एप्रिलमध्येच पंतप्रधानपद सोडावं लागलं आहे.

जानेवारी-फेब्रुवारी लाभदायक

मात्र, जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी अत्यंत लाभदायक ठरले आहेत. या दोन महिन्यात एकाही पंतप्रधानांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे हे दोन महिने पाकिस्तानच्या राजकारणासाठी अत्यंत चांगले ठरले आहेत. फेब्रुवारीत एका पंतप्रधानाचा शपथविधी झाला होता. 17 फेब्रुवारी 1997मध्ये नवाज शरीफ यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली होती. ऑगस्ट महिनाही असाच लाभदायक ठरला आहे. या महिन्यात 22 पैकी सहा नेत्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. स्वत: इम्रान खान यांनी ऑगस्ट 2018मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

संबंधित बातम्या:

Pakistan Political Crisis : इम्रान खान आऊट होताच निकटवर्तीयांवर कारवाई, प्रवक्त्याच्या घरावर रात्रीपासून छापेमारी

Pakistan Political Crisis : अखेर इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हाकलपट्टी, शहबाज शरीफ यांचा मार्ग मोकळा

Pakistan Political Crisis : इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता ! पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.