AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या शत्रूंना पाकिस्तानात आसरा, दहशतवाद्यांबाबत झोप उडवणारा अहवाल समोर

Terrorism : भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मात्र तरीही भारतावरील धोका अद्याप टळलेला नाही. अमेरिकेच्या एका अहवालात याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भारताच्या शत्रूंना पाकिस्तानात आसरा, दहशतवाद्यांबाबत झोप उडवणारा अहवाल समोर
terroristsImage Credit source: Google
| Updated on: Mar 28, 2026 | 2:30 PM
Share

भारताला नेहमीच पाकिस्तानी दहशतवाद्यांपासून धोका राहिलेला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला करून 26 भारतीय नागरिकांचा जीव घेतला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात घुसून 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मात्र अजूनही भारताचा धोका टळलेला नाही. पाकिस्तान अजूनही भारताविरुद्ध सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांचे आश्रयस्थान आहे, असा खुलासा अमेरिकेच्या काँग्रेस रिसर्च सर्व्हिस (CRS) च्या ताज्या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे भारताला अशा कारवाया हाणून पाडण्यासाठी तयार रहावे लागणार आहे. या अहवालाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अहवालातून धक्कादायक माहिती समोर

अमेरिकेच्या काँग्रेस रिसर्च सर्व्हिसच्या अहवालातून अशी माहिती समोर आली आहे की, पाकिस्तानमध्ये अनेक प्रमुख दहशतवादी संघटना सक्रिय असून त्यांचे मुख्य टार्गेट जम्मू-काश्मीर आणि भारत हे आहे. काही दहशतवादी गट जम्मू काश्मीरमध्ये बेधडकपणे कारावाया करत असल्याचेही समोर आले आहे. CRS च्या इन फोकस या अहवालात 15 दहशतवादी संघटनांची माहिती देण्यात आली आहे. यांपैकी अनेक संघटनांना अमेरिकेने विदेशी दहशतवादी संघटना (FTO) म्हणून घोषित केले आहे. यात खालील संघटनांचा समावेश आहे.

  • लष्कर-ए-तैयबा (LeT)
  • जैश-ए-मोहम्मद (JeM)
  • हरकत-उल जिहाद इस्लामी (HUJI)
  • हरकत-उल-मुजाहिदीन (HuM)
  • हिज्बुल मुजाहिदीन (HM)

मदरशांची भूमिका

अमेरिकेच्या या अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, पाकिस्तान या दहशतवादी गटांचा पूर्णपणे नायनाट करण्यात अपयशी ठरला आहे. हवाई हल्ले आणि लाखो गुप्तचर कारवाया आणि मोठ्या लष्करी मोहिमा असूनही, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या या दहशतवादी संघटनांचा नायनाट करण्यात अपयश आले आहे. 2014 च्या नॅशनल अॅक्शन प्लॅनचा उद्देश या गटांचा नाश करणे हा होता, परंतु या संघटना अजूनही सक्रिय आहेत. पाकिस्तानने 2023 मध्ये दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी काही पावले उचलली होती, मात्र तेथील मदरशांमध्ये अजूनही अशा विचारसरणीचे शिक्षण दिले जाते जे हिंसक अतिरेकी विचारधारेस प्रोत्साहन देऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानी सरकारची चिंता वाढलेली आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?