AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा टाहो…भारत घरात घुसून आमच्या एजंटांचा खात्मा करतोय

pakistan allegation against india | भारत पाकिस्तानमध्ये हत्यासत्र घडवण्याचे काम शिताफीने करत आहे. त्यासाठी भारताने तिसऱ्या देशातील लोकांचा वापर सुरु केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सायरस काजी यांनी हा आरोप केला आहे.

पाकिस्तानचा टाहो...भारत घरात घुसून आमच्या एजंटांचा खात्मा करतोय
| Updated on: Jan 28, 2024 | 8:26 AM
Share

कराची, दि.28 जानेवारी 2024 | पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतविरोधी दहशतवाद्यांची हत्या होत आहे. या घटनाक्रमानंतर पाकिस्तानने भारतावर आरोप केले आहेत. भारत घरात घुसून आमच्या एजंटाची हत्या घडवत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, भारतीय एजंट पाकिस्तानी भूमीवर त्यांच्या लोकांची हत्या घडवत असल्याचे पुरावे आमच्याकडे आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सायरस काजी यांनी आपण हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघासमोर उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे.

या लोकांची हत्या

पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना परराष्ट्र सचिव सायरस काजी यांनी म्हटले की, पाकिस्तानमध्ये राहत असलेल्या भारताला हवे असणाऱ्या लोकांना भारत टारगेट करत आहे. शाहिद लतीफ आणि मुहम्मद रियाज यांची काही महिन्यांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. शाहिद पठाणकोठ हल्ल्यातील मास्टरमाइंड होता. पाकिस्तानी नागरिक रियाज याची हत्या मागील वर्षी सप्टेंबरमध्ये झाली होती. पाकव्याप्त काश्मीरमधील एका मशिदीत त्याची हत्या झाली होती. अन्य एक पाकिस्तानी व्यक्ती लतीफ याची ऑक्टोंबर महिन्यात हत्या झाली होती. हे सर्व भारतासाठी मोस्ट वॉटेंड होते.

या भारतीय एजंटांवर जबाबदारी

भारत पाकिस्तानमध्ये हत्यासत्र घडवण्याचे काम शिताफीने करत आहे. त्यासाठी भारताने तिसऱ्या देशातील लोकांचा वापर सुरु केला आहे. भारतीय एजंट लहान गुन्हेगार आणि जिहाद्दी प्रवृत्तीच्या लोकांना लालच देऊन वापर असल्याचे परराष्ट्र सचिवांनी सांगितले. भारतीय एजेंट योगेश कुमार आणि अशोक कुमार आनंद ही जबाबदारी पार पाडत आहे. सायरस काजी यांनी तिसऱ्या देशाचे नाव यावेळी सांगितले नाही.

पाकिस्तानकडे पुरावे असल्याचा दावा

सायरस म्हणाले की, मुहम्मद अब्दुल्ला अली याने शाहिदची हत्या केली होती. त्याच्यावर ही जबाबदारी देण्यासाठी भारतीय एजंटांनी सोशल मीडिया ॲप टेलिग्रामचा वापर केला. या ॲपद्वारे त्यांना शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही उपलब्ध करून दिला. पाकिस्तानकडे या आरोपींच कबुलीजबाब आणि हत्यांशी संबंधित पुरावे आहे. भारतीय एजंटांनी त्यांच्याशी पैशाचे व्यवहार केल्याचे पुरावे आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.