AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम्ही पाणी बंद केले, आम्ही तुमचा श्वास रोखू…’, पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची हाफिज सईदची भाषा

भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार पहलगाम हल्ल्यानंतर स्थगित केला. त्याचा उल्लेख करत पाकिस्तानी लष्करातील अधिकारी अहमद शरीफ चौधरी हाफिज सईदची भाषा बोलत आहे. भारताने आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू.

'तुम्ही पाणी बंद केले, आम्ही तुमचा श्वास रोखू...', पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची हाफिज सईदची भाषा
लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी
| Updated on: May 23, 2025 | 1:01 PM
Share

दहशतवादी हाफिज सईद याची भाषा पाकिस्तान लष्करातील अधिकारीही बोलू लागले आहे. पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताविरोधात वक्तव्य केले आहे. पाकिस्तानी लष्करातील इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे डीजी अहमद शरीफ चौधरी यांनी पाकिस्तानी विद्यापीठात भाषण देताना भारतविरोधी वक्तव्य केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक पद्धतीने कारवाई केली. भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार स्थगित केला. त्याचा उल्लेख करत अहमद शरीफ चौधरी म्हणाले, भारताने आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू. सिंधू नदीवरील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार आणि सतलज, बियास, रावी, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाणी वाटप आणि व्यवस्थापनाच्या अटींशी संबंधित आहे. या करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियमित माहितीची देवाणघेवाण करणे देखील बंधनकारक आहे. या करारात जागतिक बँक मध्यस्थ म्हणून सहभागी आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानला दहशतवादी कारवाया थांबवण्याचे अनेक वेळा सांगितले आहे. रक्त आणि पाणी एका वेळी वाहू शकत नाही, असे भारताने म्हटले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर २३ एप्रिल रोजी पाकिस्तानविरोधात अनेक पाऊले उचलली. त्यात सिंधू पाणी वाटप करार रद्द केला. तसेच अटारी सीमेवरील चेक पोस्ट बंद केली. त्यानंतर ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर केले. त्यात पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील ९ दहशतवादी तळे नष्ट केली. भारताच्या या कारवाईत बहावलपूरमधील जैशचे आणि मुरीदमधील लश्करचे हेडक्वार्टर उद्ध्वस्त झाले. या कारवाईत शंभर पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले.

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून भारतावर पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले. परंतु भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने त्यांचे सर्व हल्ले निष्प्रभ केले. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारताने पुन्हा कारवाई करत ११ हवाई तळांवर बॉम्ब टाकले. सरगोधा, नूर खान, जेकबाबाद आणि राहरयार खान हवाई तळांवर अचूक हल्ले करून पाकिस्तानची जगभरात नाचक्की केली. भारताचे हल्ले इतके प्रभावी होते की पाकिस्तानला दोन दिवसांत युद्धबंदीची मागणी करावी लागली.

Follow Us
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं.
महिला आरक्षणावरून राजकारण तापलं; खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं
महिला आरक्षणावरून राजकारण तापलं; खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं.
खरातच्या गुन्ह्यांचा अंतच नाही! नाशिकच्या सिन्नरमध्ये 15वा गुन्हा दाखल
खरातच्या गुन्ह्यांचा अंतच नाही! नाशिकच्या सिन्नरमध्ये 15वा गुन्हा दाखल.
सुळे यांचा थेट सरकारला सवाल, विधेयक मंजूर, मग अंमलबजावणी का नाही?
सुळे यांचा थेट सरकारला सवाल, विधेयक मंजूर, मग अंमलबजावणी का नाही?.
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान; मुख्यमंत्री फडणवीसांचे आव्हान
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान; मुख्यमंत्री फडणवीसांचे आव्हान.
भाजपवाले काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही, ही जप्त केलेल्या ड्रग्सची
भाजपवाले काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही, ही जप्त केलेल्या ड्रग्सची.