AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम्ही पाणी बंद केले, आम्ही तुमचा श्वास रोखू…’, पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची हाफिज सईदची भाषा

भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार पहलगाम हल्ल्यानंतर स्थगित केला. त्याचा उल्लेख करत पाकिस्तानी लष्करातील अधिकारी अहमद शरीफ चौधरी हाफिज सईदची भाषा बोलत आहे. भारताने आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू.

'तुम्ही पाणी बंद केले, आम्ही तुमचा श्वास रोखू...', पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची हाफिज सईदची भाषा
लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी
| Updated on: May 23, 2025 | 1:01 PM
Share

दहशतवादी हाफिज सईद याची भाषा पाकिस्तान लष्करातील अधिकारीही बोलू लागले आहे. पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताविरोधात वक्तव्य केले आहे. पाकिस्तानी लष्करातील इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे डीजी अहमद शरीफ चौधरी यांनी पाकिस्तानी विद्यापीठात भाषण देताना भारतविरोधी वक्तव्य केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक पद्धतीने कारवाई केली. भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार स्थगित केला. त्याचा उल्लेख करत अहमद शरीफ चौधरी म्हणाले, भारताने आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू. सिंधू नदीवरील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार आणि सतलज, बियास, रावी, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाणी वाटप आणि व्यवस्थापनाच्या अटींशी संबंधित आहे. या करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियमित माहितीची देवाणघेवाण करणे देखील बंधनकारक आहे. या करारात जागतिक बँक मध्यस्थ म्हणून सहभागी आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानला दहशतवादी कारवाया थांबवण्याचे अनेक वेळा सांगितले आहे. रक्त आणि पाणी एका वेळी वाहू शकत नाही, असे भारताने म्हटले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर २३ एप्रिल रोजी पाकिस्तानविरोधात अनेक पाऊले उचलली. त्यात सिंधू पाणी वाटप करार रद्द केला. तसेच अटारी सीमेवरील चेक पोस्ट बंद केली. त्यानंतर ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर केले. त्यात पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील ९ दहशतवादी तळे नष्ट केली. भारताच्या या कारवाईत बहावलपूरमधील जैशचे आणि मुरीदमधील लश्करचे हेडक्वार्टर उद्ध्वस्त झाले. या कारवाईत शंभर पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले.

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून भारतावर पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले. परंतु भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने त्यांचे सर्व हल्ले निष्प्रभ केले. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारताने पुन्हा कारवाई करत ११ हवाई तळांवर बॉम्ब टाकले. सरगोधा, नूर खान, जेकबाबाद आणि राहरयार खान हवाई तळांवर अचूक हल्ले करून पाकिस्तानची जगभरात नाचक्की केली. भारताचे हल्ले इतके प्रभावी होते की पाकिस्तानला दोन दिवसांत युद्धबंदीची मागणी करावी लागली.

Follow Us
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल.
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.