AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भारताच्या संसदेत विरोधकांचे माईक बंद असतात”; राहुल गांधी यांनी पुन्हा साधला निशाणा…

भारताच्या परराष्ट्र धोरणावर आक्षेप घेणे हा तुमच्या अल्प बुद्धीचा पुरावा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परदेशातून तुम्ही भारताविषयी जे खोटे पसरवले आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

भारताच्या संसदेत विरोधकांचे माईक बंद असतात; राहुल गांधी यांनी पुन्हा साधला निशाणा...
| Updated on: Mar 07, 2023 | 12:42 AM
Share

नवी दिल्लीः काँग्रेसचे नेते आणि खासदा राहुल गांधी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी त्यांनी लंडनमधील संसदेच्या सभागृहात ब्रिटीश खासदारांबरोबर संवाद साधला. भारतातील राजकीय परिस्थिती आणि भारतीय संसदेतील विविध गोष्टींवर त्यांनी खासदारांबरोबर संवाद साधला आहे. भारतात संसदेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, कधी कधी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मायक्रोफोन बंद केले जातात.

राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचे विरोधी मजूर पक्षाचे आणि भारतीय वंशाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी हाऊस ऑफ कॉमन्सच्या ग्रँड कमिटी रूममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’चेही त्यांनी आपले अनुभव सांगितले.

यादरम्यान राहुल गांधी यांनी मायक्रोफोनचा वापर केला मात्र तो सदोष होतो अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.त्यानंतर ते म्हणाले की, आमचे माइक खराब नाहीत तर ते काम करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

पण तरीही तुम्ही ते चालू करू शकत नाही. कारण जेव्हा मी संसदेत माझा मुद्दा मांडतो तेव्हा तिथे अनेकदा याविरोधात घडले आहे. त्यामुळे भारतीय संसदेतील आवाज दडपला जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सांगितले की, आम्ही नोटाबंदीचा निर्णय घेतला होता,मात्र तो एक विनाशकारी आर्थिक निर्णय होता. आम्हाला या विषयावर चर्चा करण्याची परवानगी नव्हती.

मात्र जीएसटीचा संदर्भ देत ते म्हणाले की, आम्हाला त्यावर चर्चाही करू देण्यात आली नाही. तसेच चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्याच्या मुद्द्यावरुनही आम्हाला बोलू दिले नाही.

या सगळ्या गोष्टींवर भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे तर चीनचे कौतुक केले म्हणून परदेशात जाऊन तुम्ही भारताची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच देशाशी गद्दारी करू नये असंही त्यांनी यावेळी सांगितले.

अनुराग ठाकुर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना तुम्ही भारताचा विश्वासघात करू नये अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

तर भारताच्या परराष्ट्र धोरणावर आक्षेप घेणे हा तुमच्या अल्प बुद्धीचा पुरावा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परदेशातून तुम्ही भारताविषयी जे खोटे पसरवले आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.