AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी सैन्यानेच आम्हाला… असीम मुनीरचा लष्कर-ए-तैयबानच्या दहशतवाद्याने केला पर्दाफाश, खळबळजनक खुलासा…

भारत आणि पाकिस्तानमध्ये कायमच तणाव बघायला मिळाला. त्यामध्येच लष्कर-ए-तैयबानच्या एका दहशतवाद्याने केलेल्या खुलाशानंतर मोठी खळबळ उडाली. थेट पाकिस्तान सैन्याची पोलखोल करण्यात आली.

पाकिस्तानी सैन्यानेच आम्हाला... असीम मुनीरचा लष्कर-ए-तैयबानच्या दहशतवाद्याने केला पर्दाफाश, खळबळजनक खुलासा...
Saifullah Kasuri
| Updated on: Jan 11, 2026 | 10:58 AM
Share

पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाला समर्थन करत नसल्याचे दाखवताना दिसत आहे. मात्र, पाकिस्तानी लष्कराचा आणि सरकारचा दहशतवाद्यांना पूर्णपणे पाठिंबा असल्याचे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले. भारताने आंतराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा बुरखा फाडला. भारतात अनेक दहशतवादी कारवाई पाकिस्तानने घडवून आणल्या आहेत. हेच नाही तर पहलगाम हल्ला पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी केला. थेट संबंध दिसून आले. भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तान लष्कर दहशतवाद्यांना मदत करतो. पाकिस्तान आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेमधील संबंधांच्या जुन्या आरोपांना आता नवा पुरावा मिळाला आहे. ज्यामध्ये मोठा दावा करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कथित सूत्रधार सैफुल्लाह कसूरीने पाकिस्तानी सैन्याशी आपले जवळचे संबंध असल्याचे जाहीरपणे म्हटले.

नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कसूरी याने भर मंचावर म्हटले की, पाकिस्तानी सैन्य नियमितपणे आपल्याला त्यांच्या कार्यक्रमांना बोलवत असते. हेच नाही तर सैनिकांच्या अंतिम संस्कारालाही बोलावले जाते. कसूरी हा पाकिस्तानातील एका शाळेतील कार्यक्रमात हे सर्व बोलताना दिसला. यावेळी तो शाळेतील मुलांना संबोधित करत होता. पाकिस्तानी सैन्य आपल्याला कायमच आमंत्रित करत असल्याचे कसूरी याने सांगितल्याने पाकिस्तानचा खोटेपणा जगापुढे आला.

यादरम्यान सैफुल्लाह कसूरी याने भारताबद्दल भडकाऊ भाषण केले. कसूरीने याने म्हटले की, सध्या भारत घाबरलेला आहे. कसूरीने यादरम्यान मान्य केले की, भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी ठिकाणांचे नुकसान झाले. पण ही भारताने अत्यंत मोठी चूक केली. लश्कर ए तैयबा काश्मीरच्या मुद्दयावर मागे हटणार नसल्याचेही त्याने म्हटले.

हेच नाही तर कसूरी याने पहलगाम हल्ला आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचेही म्हटले होते, त्यानंतर तो जगभरात प्रसिद्धीला आला होता. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी पहलगामध्ये मोठा हल्ला केला होता, या हल्ल्यात तब्बस 26 हिंदू लोकांची हत्या करण्यात आली. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव त्यावेळी बघायला मिळाला. भारताने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले.

Follow Us
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान
काही काळातच मोठं घडलं; ते एक विधान आणि.... आष्टिकरांच्या लेकाची पक्षात
काही काळातच मोठं घडलं; ठाकरे गटातील बंडखोर नेत्याला मोठा धक्का; पक्षाने थेट लेकाला...
ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; आष्टीकरांचा अंधारेंवर हल्लाबोल
Krushna Ashtikar | ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; कृष्णा आष्टीकरांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
Sanjay Raut UNCUT | मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं? शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
Big Breaking | ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत सर्वात मोठी अपडेट; राजकारणातील घडमोडींना वेग
विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
Vidhan Parishad Election Result | विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?