पाकिस्तानचे दोन तुकडे पाडण्याचा गेम बाथरूममध्येच शिजला, दोन नेते तिथेच भेटले; बांगलादेशच्या निर्मितीची गरज का पडली?
धार्मिक आणि आर्थिक असमानतेमुळे 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन भाग झाले. लाखोंच्या संख्येनं लोकांचा मृत्यू झाला आणि त्याहून दुप्पट लोक बेघर झाले, तेव्हा कुठे पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारातून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं होतं. आता पाकिस्तान सैन्याशी जवळीक आणि दहशतवादी गटांची बांगलादेशमध्ये एण्ट्री.. यामुळे बांगलादेश पुन्हा पाकिस्तान बनण्याच्या मार्गावर आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय.

भारताच्या शेजारील देश बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. तिथे लोक रस्त्यावर उतरले आहेत. भारताचे महान चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या वडिलोपार्जित घराचीही तोडफोड करण्यात आली. गेल्या वर्षीही जुलैमध्ये बांगलादेशमध्ये दंगल सुरू झाली होती. ज्याचं रुपांतर तीव्र हिंसाचारात झालं होतं. ज्यामुळे शेख हसीना यांना केवळ बांगलादेशचं पंतप्रधानपदच नाही तर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देशही सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. परंतु यावेळी दृश्य थोडं वेगळं आहे. आता दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर संस्थेनंतर आता पाकिस्तानी दहशतवादी गटही बांगलादेशात घुसले आहेत. अशा परिस्थितीत, बांगलादेश पुन्हा एकदा पाकिस्तान...
