AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत विरोधी नेता होणार बांगलादेशचे नवे पंतप्रधान, भारताला मोठा झटका?

बांगलादेशमध्ये लाखो लोकं रस्त्यावर उतरले आणि शेख हसीन यांना पंतप्रधानपद सोडून देश सोडून जावं लागलं. पण हे काही अचानक घडलेलं नाही. याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. बांगलादेशात आता नवीन काळजीवाहू सरकार स्थापन होणार आहे. या सरकारचे पंतप्रधान भारतविरोधी असल्याचं बोललं जात आहे.

भारत विरोधी नेता होणार बांगलादेशचे नवे पंतप्रधान, भारताला मोठा झटका?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 05, 2024 | 8:22 PM
Share

शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना देशही सोडावा लागला आहे. सध्या त्या भारतात आल्या असून काही दिवसांनी त्या लंडनमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर आता बांगलादेशमध्ये नव्या पंतप्रधानाचा शोध सुरू झालाय. बांगलादेश लष्कराने अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केलीये.  पण या सरकारमध्ये सत्ताधारी अवामी लीगच्या कोणत्याही नेत्याचा समावेश करणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. अशा स्थितीत बांगलादेशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)चे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान देशाचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ते माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आहेत.

तारिक यांनी बांगलादेशी जनतेचे केले अभिनंदन

तारिक पुढे म्हणाले की, “समाजाच्या सर्व स्तरांतील विद्यार्थी आणि आंदोलकांचे अभिनंदन. या ऐतिहासिक दिवशी न्यायाची त्यांची निस्वार्थ भावना आणि आपल्या देशबांधवांवर प्रेम आहे. बांगलादेशला लोकशाही आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ या. “, जिथे सर्व लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य संरक्षित केले जाते.”

तारिक रहमान नवे पंतप्रधान होऊ शकतात

तारिक रहमान यांना बांगलादेशचे पुढील पंतप्रधान मानले जात आहे. बांगलादेश लष्कर नवीन काळजीवाहू सरकार स्थापन करणार आहे त्यात बीएनपी सर्वात मोठी भूमिका बजावेल. तारिक हे सध्या बीएनपीचे सर्वात मोठे नेते असल्याने त्यांना नव्या काळजीवाहू सरकारमध्ये सर्वात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. बांगलादेश लष्कराने म्हटले आहे की, अवामी लीगचा एकही सदस्य त्यांनी बोलावलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत सहभागी झाला नव्हता. अशा परिस्थितीत दुसरा सर्वात मोठा राजकीय पक्ष बीएनपी असेल.

तारिक रहमान हे भारतविरोधी राजकारण करतात

तारिक रहमान हे बांगलादेशातील भारतविरोधी राजकारणाचे प्रमुख मानले जातात. बांगलादेशातील इंडिया आऊट मोहिमेला ते अनेक वर्षांपासून संरक्षण देत आहेत. दहशतवाद पसरवल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर तारिक रहमानला 2018 मध्ये 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 21 ऑगस्ट 2004 रोजी अवामी लीगच्या रॅलीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते दोषी आढळले होते.

Follow Us
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल