AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने बांगलादेशची काढली थेट हवा, भारताचे राजदूत मैदानात, दगडफेकीच्या वातावरणात..

बांगलादेशात हिंसाचार सुरू आहे. भारतीय लोकांना टार्गेट केले जात आहे. हेच नाही तर भारतीय दूतावासावर दगडफेक करण्यात आली. यादरम्यान भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा सोमवारी अॅक्शन मोडमध्ये आले.

भारताने बांगलादेशची काढली थेट हवा, भारताचे राजदूत मैदानात, दगडफेकीच्या वातावरणात..
Indian Embassy Bangladesh
| Updated on: Dec 23, 2025 | 8:33 AM
Share

बांगलादेशमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यापासून भारत आणि बांगलादेशातील संबंध तणावात आहेत. हेच नाही तर बांगलादेशात हिंदूंवर प्रचंड प्रमाणात अत्याचार वाढले आहेत, याबाबतचे काही धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बांगलादेशात कहर सध्या बघायला मिळतोय. हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. बांगलादेशात हिंसाचार वाढला आहे आणि हिंसक आंदोलने सुरू आहेत. हेच नाही तर भारतीय व्हिसा कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. याच पार्श्वभूमीनंतर भारताने मोठा निर्णय घेत बांगलादेशातील खुलना, राजशाही, चितगाव येथील व्हिसा सेवा निलंबित केल्या. भारताने घेतलेल्या निर्णयानंतर बांगलादेशानेही थेट भारतातील व्हिसा सेवा पूर्णपणे बंद केली. आता दोन्ही देशातील संबंध तणावात आहेत.

बांगलादेशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा सोमवारी अॅक्शन मोडमध्ये दिसले. भारतीय दूतावासांविरुद्ध दिल्या जाणाऱ्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून ते थेट ढाका येथील जमुना फ्युचर पार्कमधील भारतीय व्हिसा अर्ज केंद्रात गेले आणि तेथे उपस्थित असलेल्या सामान्य बांगलादेशी नागरिकांना भेटले. भारतीय दूतावाला धमक्या सध्या दिल्या जात आहेत. भारताच्या सरकारचे बांगलादेशातील घडामोडींवर बारीक लक्ष आहे.

हेच नाही तर सीमेवरही सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याची माहिती आहे. बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे.  सर्व अडचणी असूनही भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा भारत मानवतावादी दृष्टिकोनातून व्हिसा सेवा सुरू ठेवण्यास कटिबद्ध आहे, हा संदेश देण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यांनी यादरम्यान थेट लोकांसोबत संवाद देखील साधला.

प्रणय वर्मा यांच्या भेटीदरम्यान, व्हिसा प्रक्रियेतील तांत्रिक आणि बाह्य अडथळ्यांबाबतही चर्चा झाली. ढाकामध्ये परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चितगावमधील परिस्थिती चिंताजनक आहे. 19 डिसेंबरच्या रात्री जमावाने चितगावमधील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांवर (एएचसीआय) हल्ला केला. ज्यामुळे हे व्हिसा केंद्र तात्काळ बंद करण्यात आले. सुरक्षा कारणामुळे हे व्हिसा केंद्र बंद करण्यात आले. बांगलादेश सध्या पाकिस्तानचा जवळचा मित्र बनला असून तिथे मोठी हिंसा सुरू आहे. यादरम्यान भारतीय लष्कर अलर्ट मोडवर आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ