AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिवंत माणूस पाण्यात बुडतो, मग डेडबॉडी कशी तरंगते ? काय आहे कारण ?; खाजवा डोकं

पण एखादा जिवंत माणूस पाण्यात पडला तर तो बुडतो, पण मृत्यू झाल्यावर डेडबॉडी मात्र पाण्यावर तरंगते, हे कसं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का ? शरीर तर तेच असतं, वजनही तेच... मग यामागे काय कारण ?

जिवंत माणूस पाण्यात बुडतो, मग डेडबॉडी कशी तरंगते ? काय आहे कारण ?; खाजवा डोकं
जिवंत माणूस पाण्यात बुडतो, मग मृतदेह कसा तरंगतो ?Image Credit source: social media
| Updated on: Nov 06, 2024 | 11:45 AM
Share

एखाद्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी आपण ऐकतो. आपल्यापैकी काही लोकांनी मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिला असेल, किंवा एखाद्या व्यक्तीचा मृतदेह नदीच्या पाण्यात सापडला अशी बातमीही ऐकली असेल. कोरोना काळात देशातील काही नद्यांमध्ये अनेक मृतदेह तरंगताना दिसले, त्याचीही बरीच चर्चा झाली. पण एखादा जिवंत माणूस पाण्यात पडला तर तो बुडतो, पण मृत्यू झाल्यावर डेडबॉडी मात्र पाण्यावर तरंगते, हे कसं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का ?

जिवंत व्यक्ती पाण्यात असेल, तर पाण्याच्या वर राहण्यासाठी, तरंगण्यासाठी मेहनत करावी लागते, हात-पाय मारावे लागतात. यामागे काही खास कारण आहे की तो एखादा चमत्कार आहे. ? यामागे खरंतर वैज्ञानिक कारण आहे.

हे आहे कारण

खरंतर एखादी वस्तू पाण्यावर तरंगेल की नाही हे तिच्या घनतेवर अवलंबून असतं. आणि पाण्याच्या वर राहण्यासाठी ती ( वस्तू) तिच्या आजूबाजूने किती पाणी बाजूला करते यावरही ते निर्भर असतं. ज्या वस्तूची घनता जास्त असते ती पाण्यात बुडते. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या शरीराची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात बुडते तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी त्याच्या फुफ्फुसात जाते. त्यामुळेच मनुष्याचा मृत्यू होतो.

मात्र लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, माणसाचा मृत्यू होताच, त्याचं शरीर पाण्याच्या वर न येता, एकदम तळापर्यंत जातं.

म्हणून ती वस्तू तरंगू लागते

आर्किमिडीज या शास्त्रज्ञाच्या सिद्धांतानुसार, एखादी वस्तू पाण्यामध्ये बुडते जेव्हा ती त्याच्या वजनाइतकी पाण्याचे विस्थापन करू शकत नाही. त्या वस्तूने विस्थापित केलेल्या पाण्याचे वजन कमी असल्यास ती वस्तू पाण्यात तरंगत राहते.

मृत्यू झाल्यावर शरीर पाण्यावर का तरंगतं ?

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीराच्या गॅस तयार होऊ लागतो, ज्यामुळे त्याचे शरीर पाण्यात सूजू लागते. सूज झाल्यामुळे शरीराची मात्रा वाढते आणि घनता कमी होते. अशा स्थितीत मृतदेह वर येतो आणि पाण्यावर तरंगू लागतो.

मृत शरीरात कोणता गॅस तयार होतो ?

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती काम करणे थांबवते. शरीराचे विघटन होऊ लागते. मृत शरीरातील बॅक्टेरिया त्याच्या पेशी आणि ऊती नष्ट करू लागतात. जीवाणूंमुळे शरीरात मिथेन, अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड, कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजनचा समावेश असलेल्या विविध वायूंचा समावेश होतो. हा वायू तयार होऊन बाहेर पडल्यावर तो तरंगू लागतो. पाण्यात बुडल्यावर शरीर लगेच वरती येत नाही, त्याला काही कालावधी किंवा काही दिवस लागू शकतात.

बऱ्याच गोष्टी पाण्यावर का तरंगतात ?

साधारणत: आपल्याला पाण्यावर अनेक गोष्टी तरंगताना दिसतात. लाकूड,कागद, पानं वगैरे गोष्टी. बर्फही अशी गोष्ट आहे जी पाण्यात बुडत नाही. जड वस्तू पाण्यात बुडतात, परंतु हलक्या वस्तू पाण्यात तरंगतात हाँ सामान्य नियम आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.