AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या गावात फक्त ‘लव्ह मॅरेज’ होतात, तीन पिढ्यांची परंपरा; महाराष्ट्रापासून…

गुजरातच्या भाटपोर गावात 90% पेक्षा जास्त प्रेमविवाह होतात. तीन दशकांपासून चालत असलेली ही परंपरा गावाच्या संस्कृतीचा भाग बनली आहे. आईवडिलांचा आणि बुजुर्गांचा याला पूर्ण पाठिंबा आहे. स्वातंत्र्याने जोडीदार निवडण्याची आणि प्रेमावर आधारित नातेसंबंध निर्माण करण्याची ही एक अनोखी प्रथा आहे.

भारतातील या गावात फक्त 'लव्ह मॅरेज' होतात, तीन पिढ्यांची परंपरा; महाराष्ट्रापासून...
| Edited By: | Updated on: Feb 25, 2025 | 3:32 PM
Share

भारतीय समाजात लग्न ही एक पवित्र गोष्ट मानल्या जाते. खासकरून आईवडिलांच्या मर्जीने मुलांची लग्न लावण्याची प्रथा भारतात आहे. भारतात लव्ह मॅरेज होतात. पण ती प्रथा म्हणून अजूनही स्वीकारली गेली नाही. शिवाय लव्ह मॅरेजचं प्रमाण अत्यंत कमी आहे. पण महाराष्ट्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुजरातमध्ये मात्र लव्ह मॅरेजची अनोखी प्रथा आहे. गुजरातच्या भाटपोर गावातील लोकांची विचारसरणी काही औरच आहे. या गावातील 90 टक्क्याहून अधिक लोक प्रेम विवाह करतात. लव्ह मॅरेजची ही परंपरा गेल्या तीन दशकापासून या गावात सुरू आहे. लव्ह मॅरेजचं गाव म्हणूनच हे गाव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.

भाटपोर गाव सुरतच्या जवळ आहे. या ठिकाणी जवळपास 90 टक्के विवाह गावातच होतात. या गावातील लोक आपला जीवनसाथी स्वत: निवडतात. जोडीदार निवडीचं हे स्वातंत्र्य या गावालाही मान्य आहे. गावातील तरुण आपल्या कुटुंबाच्या सहमतीने विवाह करतात. विशेष म्हणजे या लव्ह मॅरेजच्या परंपरेला गावातील बुजुर्गांचाही पाठिंबा असतो. कुठूनही विरोधाचा सूर येत नाही. कारण या गावातील आजी-आजोबांनीही लव्ह मॅरेज केलेलं आहे. त्याममुळे त्यांना लव्ह मॅरेजबद्दल काहीच वावगं वाटत नाही.

गावातल्या गावातच सोयरीक

लव्ह मॅरेजची ही परंपरा गावातील अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आपल्याच गावातील मुला मुलींना गावातच प्रेम विवाह करण्याची आमच्या गावची परंपरा आहे. ही परंपरा आजकालची नाही. गेल्या दोन तीन पिढ्यांपासूनची ही परंपरा आहे. आम्हाला या परंपरेचा अभिमान आहे. गावातील बुजुर्गही या परंपरेला पूर्ण पाठिंबा देत आहेत. ही पंरपरा निव्वळ परंपरा नाही, तर ही आमच्या गावची ओळख आहे, असं या गावातील बुजुर्गांचं म्हणणं आहे. तसेच या गावातील लोक गावाच्या बाहेर लग्न करत नाही. म्हणजे बाहेरच्या गावातील मुला किंवा मुलीशी लग्न करत नाहीत. आपल्याच गावातील मुला, मुलींशी विवाह करतात.

ट्रेंड नाही, परंपरा

भाटपोर गावातील लव्ह मॅरेज हा एक ट्रेंड नाहीये. ही एक परंपरा बनललेली आहे. प्रेमातून निर्माण झालेलं नातं अत्यंत मजबूत असतं असं या गावातील लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच या गावातील लोक आपला जीवन साथी स्वत: निवडतात. या गावातील होणारी लग्नही इतर गावांपेक्षा वेगळीच असतात. कारण लव्ह मॅरेजच्या निर्णयात घरातील लोक हस्तक्षेप करत नाही. त्यांना तशी गरजही पडत नाही.

या शिवाय गावातील लोक नात्याला पूर्णपणे स्वतंत्रपणे पाहतात. मुलगा आणि मुलगी जर एकमेकांना पसंत करत असतील तर ते लग्न करण्यासाठी स्वतंत्र आहेत, असं कुटुंबाचं म्हणणं असतं. या गावातील बुजुर्ग सुद्धा आपली मुलं आणि नातवांच्या निर्णयावर विश्वास ठेवतात. त्यामुळेच नाती मजबूत असतात. परिणामी घटस्फोट घेण्याचं आणि महिलांवरील अत्याचाराचं प्रमाणही अत्यंत कमी आहे.

भारतात सर्वाधिक लोक अरेंज मॅरेजवर विश्वास ठेवतात. अरेंज मॅरेज त्यांना योग्य वाटतं. पण भाटपोर गावातील उदाहरण वेगळंच आहे. या गावातील पंरपरा आणि संस्कृती जरा हटकेच आहे. गावातील लोक ही परंपरा अभिमानाने निभावत असतात. तसेच येणाऱ्या पिढ्यांनाही या परंपरेत प्रोत्साहन देतात.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.