AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिठापासून पिठापर्यंत सर्वच महाग… भारतच नव्हे तर जगभरात भडकतोय महागाईचा आगडोंब; कारण काय?

भारतात मिठापासून पिठापर्यंत सर्वच महाग झालं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पण महागाईचा हा आगडोंब केवळ भारतातच उसळलेला नाही तर संपूर्ण जगात उसळला आहे.

मिठापासून पिठापर्यंत सर्वच महाग... भारतच नव्हे तर जगभरात भडकतोय महागाईचा आगडोंब; कारण काय?
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 7:09 PM
Share

नवी दिल्ली: भारतात मिठापासून पिठापर्यंत सर्वच महाग झालं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पण महागाईचा हा आगडोंब केवळ भारतातच उसळलेला नाही तर संपूर्ण जगात उसळला आहे. जगभरातील लोकांना महागाईचे चटके बसत आहेत. अमेरिकेत मुद्रा स्फीतीचा दर गेल्या 30 वर्षात सर्वात अधिक झाला आहे. म्हणजे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक महागाई वाढली आहे. इतर देशांचीही हीच परिस्थिती आहे. भारतातील महागाईबाबत तुम्ही वाचलं असेल. करप्रणालीच्या हिशोबानेही तुम्ही महागाई वाढण्याचं कारण समजून घेतलं असेल. भारतातच नव्हे तर वैश्विक स्तरावरही महागाई का वाढत आहे? याचाच घेतलेला हा मागोवा.

महागाई किती वाढलीय?

अमेरिकेत महागाईचा दर 6.2 टक्के झाला आहे. 1990नंतरचा हा सर्वात मोठा दर आहे. गेल्या तीस वर्षात वाढली नव्हती एवढी महागाई अमेरिकेत वाढली आहे. कोर इन्फ्लेशन सुद्धा 4.6 टक्क्यावर आहे. सप्टेंबरमध्ये हा महागाई दर 5.4 टक्के होता. जगातील वाढत्या महागाईचा परिणाम आता शेअर बाजारावरही जाणवू लागला आहे.

महागाई का वाढतेय?

वाढत्या महागाईची अनेक कारणं आहेत. महागाई वाढण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. पुरवठा व्यवस्थित न झाल्याने सप्लाय चेनमध्ये गडबड होणं हे सुद्धा वाढत्या महागाईचं एक कारण आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे मागणी बंद झाली. पुरवठाही ठप्प झाला. त्यानंतर लाखो ऑर्डर रद्द करण्यात आल्या. उत्पादनही कमी करण्यात आलं. मात्र, बाजार सुरू झाल्यानंतर वेगाने मागणी वाढली. त्यामुळे उत्पादन कमी असल्याने महागाई वाढली आहे. जस जसं उत्पादन वाढेल. पुरवठा आणि मागणीतील समतोल साधला जाईल, तसतशी महागाई कमी होण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार जागतिक पातळीवर पुरवठ्याची साखळी तुटल्याने उत्पादनावर खूप परिणाम झाला आहे. हवाई वाहतूक, रेल्वे सेवा बंद झाल्यानेही पुरवठ्यात परिणाम झाला होता. त्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक उत्पादनावर अधिक झाला आहे. एकीकडे पुरवठा कमी होत आहे. दुसरीकडे वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणाची मागणीही वाढत आहे. ही कारणेही वाढत्या महागाईला कारणीभूत आहेत.

>> कोरोनाच्या काळात रेशनच्या दुकानात काही वस्तुंची कमतरता होती. दुकानदार मर्यादित प्रमाणात समान खरेदी करत होते. आता उत्पादनापासून ते पुरवठ्यापर्यंत आणि वाहतुकीपासून दुकानापर्यंत… प्रत्येक विभागात कामगारांची कमी आहे.

>> महामारी शिवाय जलवायूतील बदलांमुळेही बाजारावर परिणाम दिसत आहे. त्यामुळे जगातील अनेक भागातील पिकं नष्ट झाली आहेत. त्यामुळेही महागाई वाढली आहेत.

>> आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे दोन वर्षाची मागणी तीन महिन्यात वाढली आहे. त्यामुळे बाजार आणि अर्थव्यवस्थेचं सर्वच गणित कोलमडलं आहे. कोरोनामुळे दोन वर्षापासून आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते.

संबंधित बातम्या:

NASA Moon Mission: चंद्र मोहीम पुन्हा पुढे ढकलली, जेफ बेझोसची कंपनी ‘ब्लू ओरिजिन’ बनली मोठं कारण?

“Mars Edition” tomato ketchup, आता मंगळ ग्रहावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप !

PHOTO | तुम्हीही प्लॅस्टिकच्या भांड्यात जेवता का? जाणून घ्या तुमच्या आरोग्याला कसे पोहोचवते हानी

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.