AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगभर प्रसिद्ध असणारा भारतातला पूल, अजूनही उदघाटन झालेलं नाही, काय आहे यामागची कहाणी, वाचा

असाच एक पूल आपल्या भारत देशातही आहे. हा पूल देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या जगप्रसिद्ध पुलाचे उद्घाटन आजतागायत झालेले नाही. या पुलाशी निगडीत अनेक रंजक गोष्टी आहेत.

जगभर प्रसिद्ध असणारा भारतातला पूल, अजूनही उदघाटन झालेलं नाही, काय आहे यामागची कहाणी, वाचा
kolkata howrah bridgeImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 24, 2023 | 6:02 PM
Share

भारतात आणि जगभरातील देशांमध्ये अनेक पूल असले तरी यातील अनेक पूल असे आहेत की त्यांच्या खास गोष्टीमुळे त्यांची जगभरात वेगळी ओळख आहे. अनेक पुलांना आपल्या देशाची शानही म्हटले जाते. असाच एक पूल आपल्या भारत देशातही आहे. हा पूल देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या जगप्रसिद्ध पुलाचे उद्घाटन आजतागायत झालेले नाही. या पुलाशी निगडीत अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्या आज आम्ही तुम्हाला या सांगणार आहोत…

कोलकात्याच्या हावडा ब्रिजबद्दल बोलायचं झालं तर हा पूल नेहमीच कोलकात्याची ओळख राहिला आहे. हावडा पूल बांधून जवळपास 80 वर्षे झाली आहेत. पण, आजही तो तसाच उभा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही डिसेंबर 1942 मध्ये या पुलापासून काही अंतरावर जपानी बॉम्ब पडला होता, पण तेव्हाही हा बॉम्ब पुलाचं काहीही बिघडवू शकला नाही.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात ब्रिटिश भारत सरकारने कोलकाता आणि हावडा दरम्यान वाहणाऱ्या हुगळी नदीवर हा तरंगता पूल बांधण्याची योजना आखली. खरं तर त्या काळी हुगळी नदीत रोज अनेक जहाजं ये-जा करत असत आणि खांब असलेल्या पुलामुळे या जहाजांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो, म्हणून 1871 मध्ये हावडा ब्रिज ॲक्ट संमत करण्यात आला.

हावडा ब्रिजचे बांधकाम 1936 मध्ये सुरू झाले आणि 1942 मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर ३ फेब्रुवारी 1943 रोजी सर्वसामान्यांनी त्याचा वापर सुरू केला. त्यावेळी हा जगातील तिसरा सर्वात लांब पूल होता. कवी गुरू रवींद्रनाथ यांच्या नावावरून 1965 साली त्याचे नाव रवींद्र सेतू ठेवण्यात आले.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, हावडा ब्रिजच्या उभारणीसाठी 26,500 टन स्टीलचा वापर करण्यात आला होता, त्यापैकी 23,500 टन स्टीलचा पुरवठा टाटा स्टीलने केला होता. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण पूल नदीच्या दोन्ही बाजूला 280 फूट उंचीच्या दोनच खांबांवर उभा आहे. या दोन खांबांमधील अंतर दीड हजार फूट आहे. याशिवाय पुलाला आधार देण्यासाठी नदीत कोठेही खांब नाही.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....