AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी निर्माण केले होते आताचे सोमनाथ मंदिर? वाचा अनेकदा उध्वस्त केलेल्या या मंदिराच्या वैभवाची कहाणी

गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या वैभवाची कहाणी खूप अद्भुत आहे, या मंदिरावर अनेकदा आक्रमणे झाली आणि अनेकदा हे मंदिर उध्वस्त करण्यात आले, मात्र आजही हे मंदिर तितकेच दिमाखात उभे आहे.

कोणी निर्माण केले होते आताचे सोमनाथ मंदिर? वाचा अनेकदा उध्वस्त केलेल्या या मंदिराच्या वैभवाची कहाणी
सोमनाथ मंदिर
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 9:36 PM
Share

सोमनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेले मंदिर आहे. सोमनाथ मंदिराची (Somnath Temple) जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा एका गोष्टीची नेहमीच चर्चा होत असते. ती म्हणजे अनेकदा हे मंदिर आक्रमण करून लुटण्यात आले तरी सुद्धा आजच्या घडीला या मंदिराचे वैभव कायम आहे. तसे पाहिले तर मंदिरावर (Somnath Temple History) आक्रमणाला घेवून अनेक रिपोर्ट आणि तथ्य आहेत, असे सांगितले जाते की सोमनाथ मंदिराला 17 वेळा उध्वस्त करण्यात आहे आणि प्रत्येकवेळी याचे पुनर्निर्माण करण्यात आले. आज सुद्धा या मंदिराची चर्चा होत आहे कारण आजच्याच दिवशी 1026 साली सुल्तान महमूद गजनवी (Mahmood Ghaznavi) ने सोमनाथ मंदिर लुटून ते नष्ट केले होते.

अशातच आज या मंदिराची कहाणी पुन्हा आठवली जात आहे, या निमित्ताने आम्ही या मंदिराच्या वैभवाची कहाणी तुम्हाला सांगणार आहोत. हे सोमनाथ मंदिर कोणी बनवले होते, यातून तुम्हाला समजेल की कितीदा सोमनाथ मंदिराने हल्ले पचवले आणि पुन्हा नव्याने ते उभे राहिले. चला तर मग जाणून घेऊया सोमनाथ मंदिराशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी.

मंदिराचे असलेले पौराणिक महत्त्व

12 ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ मंदिर हे प्रथम ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमदभागवत, शिवपुराण सारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये असल्याचे आढळते. एका सरकारी वेबसाईटवर या मंदिरासंबंधी देण्यात आलेल्या माहितीत असा उल्लेख आहे, शिवपुराण आणि नंदी उपपुराणात भगवान शिवांनी सांगितले आहे की मी सर्वत्र विशेषतः ज्योतिर्लिंगाच्या सर्व स्थानांवर उपस्थित राहील. सोमनाथ याच पवित्र स्थानांपैकी एक आहे..

मंदिराचा इतिहास

एका रिपोर्ट नुसार असे मानले जाते की, समुद्र किनारी असलेल्या या मंदिराचे चार चरणात म्हणजेच भगवान सोम ने स्वर्ण, रविने चांदी, भगवान श्रीकृष्णने चंदन आणि राजा भीमदेवने दगडांपासून तयार केले आहे. ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे ही माहिती मिळते की, 11 व्या शतकापासून ते 18 व्या शतकापर्यंत अनेक मुस्लिम आक्रमकांनी अनेकदा हल्ले केले. मात्र अनेकदा लोकांच्या पुनर्निर्माणच्या उत्साहामुळे हे मंदिर पुन्हा उभारण्यात आले.

बीबीसीच्या एका रिपोर्ट नुसार, गुजरातच्या वेरावल बंदरगाह येथे स्थित या मंदिराचे अरब यात्रेकरू अल बरूनीने त्याच्या यात्रा वृत्तांतामध्ये  याचा उल्लेख केला आहे. याने प्रभावीत होवून महमूद गजनवीने सोमनाथ मंदिरावर हल्ला केला. यानंतर गुजरातचे राजा भीम आणि मालवाचे राजा भोज यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले. वर्ष 1297 मध्ये दिल्ली स्वारांनी गुजरातवर कब्जा केला आणि हे मंदिर उध्वस्त केले. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण आणि विनाशाचे सत्र सुरूच होते.

सोमनाथमध्ये दुसरे शिव मंदिर वल्लभीचे यादव राजांनी 649  मध्ये तयार केले. याशिवाय गुर्जर प्रतीहार वंशाचे राजा नागभट्ट द्वितीय, चालुक्य राजा मुलराज, राजा कुमारपाल, सौराष्ट्रचे राजा महीपाल यांसारख्या राजांनी याचे अनेकदा निर्माण केले तसेच गजनवी शिवाय सिंधचे गव्हर्नर अल – जुनैद, अलाउद्दीन खिलजी, औरंगजेब यांनी उध्वस्त केले होते. इतिहासकारांच्या माहितीनुसार सोमनाथ मंदिर हे तब्बल 17 वेळा नष्ट करण्यात आले होते आणि प्रत्येक वेळी याचे पुनर्निर्माण केले गेले.

आताचे मंदिर कोणी निर्माण केले?

आता जे मंदिर उभे आहे, त्याला भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1947 नंतर बनवले होते आणि पहील्यांना 1995 साली भारताचे राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी राष्ट्राला समर्पित केले. या मंदिराचा प्रस्ताव घेऊन पटेल महात्मा गांधी यांच्याकडे गेले होते. या प्रस्तावाचे कौतुक करत गांधींनी जनतेकडून पैसे गोळा करण्याचा पर्याय सुचवला. सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर मंदिराच्या पुनर्निर्माणचे काम एम मुंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णंत्वास आले. मुंशी त्यावेळी भारत सरकारचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते. या मंदिराचे निर्माण कैलास महामेरु प्रसाद शैलीनुसार केले गेले. या मंदिरात गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप आहेत. मंदिरावर असलेला कळस 10 किलो वजनाचा आहे आणि ध्वज दंड 27 फूट उंच असून 10 फूट परिघाचा आहे.

संबंधित बातम्या

खूपच भारी! 75 कोटींची ‘फेरारी ऑफ द सी’ घेतली, तर घर घ्यायची गरज नाही, पाहा फोटो!

पतीकडून बलात्कार हा लैंगिक अत्याचाराचा सर्वात मोठा प्रकार! दिल्ली उच्च न्यायालयात हा युक्तिवाद नेमका कशासाठी?

झोपेच्या स्थितीवरून ठरेल तुमचे आरोग्य, निरोगी हृदय आणि सुरक्षित गरोदरपणामध्ये घ्या झोपेची अश्या प्रकारे काळजी!!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.