AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीकडून बलात्कार हा लैंगिक अत्याचाराचा सर्वात मोठा प्रकार! दिल्ली उच्च न्यायालयात हा युक्तिवाद नेमका कशासाठी?

दिल्ली उच्च न्यायालयात सध्या आरआयटी फाउंडेशन, ऑल इंडिया डेमोक्रेटिक वुमन्स असोसिएशन, एक परुष आणि महिलेच्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरु आहे. भारतीय कायद्यानुसार, पतीला देण्यात येणारी सूट अथवा सवलत संपुष्टात आणण्याची विनंती यात करण्यात आली आहे.

पतीकडून बलात्कार हा लैंगिक अत्याचाराचा सर्वात मोठा प्रकार! दिल्ली उच्च न्यायालयात हा युक्तिवाद नेमका कशासाठी?
ईडीलाही आरटीआय कायद्याच्या तरतुदी लागूImage Credit source: TV 9
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 1:24 PM
Share

नवी दिल्लीः भारतीय कायद्यानुसार (Indian Law) लग्नानंतर पतीला पत्नीशी संबंध ठेवणे आणि तेदेखील तिची इच्छा नसतानाही संबंध ठेवण्याची सूट दिली आहे. मात्र पत्नीच्या आज्ञेशिवाय झालेले हे संबंध म्हणजे बलात्कार किंबहुना लैंगिक अत्याचाराचा सर्वात मोठा प्रकार असल्याचा युक्तीवाद दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) करण्यात आला. तसेच कायद्यानुसार, पतीला देण्यात आलेली ही सवलत आता संपुष्टात आणावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.

काय आहे नेमका खटला?

भारतीय बलात्कार कायद्याअंतर्गत पतीला अपवादात्मक स्थितीत पत्नीशी संबंध ठेवण्याचा दिलेला हक्क रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात एक स्त्री, एक पुरुष आणि RIT फाउंडेशन, ऑल इंडिया डेमोक्रेटिक वुमन्स असोसिएशन तर्फे दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्या NGO ने आयपीसीच्या कलम 375 च्या घटनात्मकतेला आव्हान दिले आहे. कारण विवाहित महिलांवर पतीकडून होणारा लैंगिक अत्याचाराला या कायद्याअंतर्गत भिन्न स्वरुप देण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी होईल, मात्र दिल्लीच्या उच्च न्यायालयात वकिलांनी केलेले युक्तीवाद अत्यंत महत्त्वाचे असून यातून घटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे.

वकिलांचा काय युक्तिवाद?

या प्रकरणात याचिकाकर्त्या महिलेचे प्रतिनिधीत्व ज्येष्ठ वकील कोलिन गोन्साल्विस करत आहेत. न्यामूर्ती राजीव शकधर आणि सी हरी शंकर यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद करताना ते म्हणाले, ‘वैवाहिक बलात्कार हा लैंगिक हिंसाचाराचा सर्वात मोठा प्रकार आहे, जो आपल्याकडील विविध घरांमध्ये घडत असतो. विवाह संस्थेअंतर्गत किती वेळा बलात्कार घडतो, त्याची कधीही नोंद होत नाही. ही आकडेवारी कधी पुढेही आली नाही आणि तिचे विश्लेषणही झालेले नाही. अशा वेळी कुटुंबीय किंवा पोलीसदेखील पीडितेच्या मदतीला धावून येत नाहीत. जगभरातील न्यायालयांनी वैवाहिक बलात्कार गुन्हा मानला आहे आणि लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पत्नीची irrevocable अर्थात बदलता न येणारी, अपरिवर्तनीय संमती ही संकल्पना संपुष्टात आणली पाहिजे.

सरकारी वकील नंदिता राव काय म्हणाल्या?

सरकारी वकील नंदिता राव म्हणाल्या, प्रत्येक कायद्यात विवाहित स्त्री आणि अविवाहित स्त्री वेगळ्या दृष्टीने पाहिली गेली आहे. वैवाहिक बलात्कार हा भारतातील क्रूरतेचा गुन्हा आहे. प्रत्येक कायद्यानुसार विवाहित महिला आणि अविवाहित महिला भिन्न आहेत. राव यांनी हाही दावा केला आहे की, वारंवार वैवाहिक बलात्काराचा बळी ठरल्याचा दावा करणाऱ्या याचिकाकर्त्यापैकी एकाच्या बाबतीत तर आवश्यक कारवाईसाठी कलम 498 अ आयपीसीनुनसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कलम 498 अ काय आहे?

IPC कलम 498 अ हे विवाहित महिलेवर पती किंवा सासरच्या मंडळींनी अत्याचार करण्यासंबंधी आहे. या व्यक्तींनी स्त्रीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे किंवा तिला गंभीर दुखापत अथवा जीवाला धोका निर्माण करणारे वर्तन केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला जातो.

जगभरातील निकालांचे दिले दाखले

ज्येष्ठ वकील गोन्सावलिस युक्तिवाद करताना म्हणाले, मूल्य प्रणाली आणि महिलांचे हक्क हे काळानुरूप बदलत गेले. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, युरोप संघ आणि नेपाळमधील न्यायलयांनी तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांनी अशा सर्व गुन्ह्यांमध्ये पत्नीची गृहित संमती ही असमर्थनीय होती, हा युक्तीवाद करत विविध न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निकालांनुसार यात परिवर्तन होत गेले. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले की, हिंदू धर्माने पत्नीवरील बलात्काराच्या घृणास्पद कृत्याला सूट दिलेली नाही. तसेच वैवाहिक बलात्कार ही पाश्चिमात्य संकल्पना म्हणण्यावरही गोन्साल्विस यांनी आक्षेप घेतला. काही भारतीय जोडप्यांमधील लैंगिक हिंसाचाराचे प्रमाण नोंदवणाऱ्या संयुक्त राष्ट्रांचा अहवालावरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

केंद्राच्या प्रतिज्ञापत्राकात काय म्हटलंय?

केंद्र सरकारने याप्रकरणी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, वैवाहिक बलात्कार हा फौजदारी गुन्हा ठरू शकत नाही. कारण असे केल्यास विवाहसंस्था अस्थिर करण्याचे तसेच पतींवर दबाव टाकण्याचे ते साधन बनू शकते.

या प्रकरणी पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी होईल.

इतर बातम्या-

केरळच्या शाळेत सर आणि मॅडम बंद, विद्यार्थी यापुढं शिक्षकांना टीचर नावानं हाक मारणार, नेमकं कारण काय?

ना कपूर, ना खान; हे अस्सल अहिराणी गाण्याचं वाण! 246,449,914 Views घेणारं ‘ईकस केसावर फुगे’ पाहिलंत?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.