Traffic Rules : रस्त्यावर गाडी चालवताना ‘हे’ 9 नियम जरुर पाळा, अन्यथा भरावा लागेल जबर दंड !

रस्त्यावरून गाडी चालवताना नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे. ट्रॅफिकच्या नियमांचे (Traffic Rules) पालन न केल्यास दंड तर भरावाच लागतो, मात्र नियमांकडे दुर्लक्ष केल्यास अपघातही होऊ शकतो.

Traffic Rules : रस्त्यावर गाडी चालवताना 'हे' 9 नियम जरुर पाळा, अन्यथा भरावा लागेल जबर दंड !
Image Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 11:28 AM

भारतात ड्रायव्हिंगचे नियम (Driving rules) अतिशय कडक आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी नियम मोडल्यावर भरावी लागणारी दंडाची (Challan) रक्कमही पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तरी लोकं वाहतुकीचे नियम पाळतील. ट्रॅफिकच्या नियमांचे पालन न केल्यास दंड तर भरावाच लागतो, मात्र नियमांकडे दुर्लक्ष केल्यास (accidents) अपघातही होऊ शकतो. हा अपघात कधीकधी जीवघेणाही ठरू शकतो. त्यामुळेच ड्रायव्हिंग करताना सर्व नियमांचे पालन करणे (follow these rules) अत्यंत महत्वपूर्ण आहे. सुरक्षितपणे प्रवास करण्याची इच्छा असेल तर ‘नियम पाळा, अपघात टाळा’ या उक्तीप्रमाणेच ड्रायव्हिंग करावे. स्वत:सोबतच इतरांच्या जीवाचाही विचार करावा. ड्रायव्हिंग करताना खाली दिलेल्या नियमांचे पालन अवश्य करा, अन्यथा जबर दंड भरावा लागू शकतो.

1) नेहमी सीटबेल्ट लावावा

कारमधून प्रवास करताना सीटबेल्ट लावणे हा सर्वात पहिला आणि महत्वपूर्ण नियम आहे. सीटबेल्टशिवाय प्रवास करणे दंडनीय अपराध आहे. तुम्ही कार ड्राइव्ह करत असाल किंवा बाजूला अथवा मागे बसला असाल, तर प्रवासात सीटबेल्ट लावणे गरजेचे असते. त्याशिवाय अपघात झाल्यास सीटबेल्टमुळे तुम्हाला कमीत कमी त्रास होतो आणि जीवही वाचतो. मोटार वाहन कायदा, कलम 138 (3) सीएमव्हीआर 177 एमव्हीए अंतर्गत कार चालवताना सीटबेल्ट न लावल्यास दंड भरावा लागतो.

2) गाडी चालवताना रस्त्यावर लक्ष ठेवावे

‘नजर हटी, दुर्घटना घटी’, असे म्हणतात. बऱ्याच वेळेस गाडी चालवताना आपले लक्ष रस्त्यावरून हटते किंवा आपण आपल्याच विचारात असतो. अशा वेळेस अपघात होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे गाडी चालवताना संपूर्ण लक्ष ड्रायव्हिंगवरच ठेवावे.

हे सुद्धा वाचा

3) वेगमर्यादा पाळा

वाहन चालवताना एक विशिष्ट वेगमर्यादा पाळणे हे वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसोबतच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्वाचे असते. त्याशिवाय, कमी वाहतुकीच्या रस्त्यावरून वेगानने गाडी चालवल्यास गाडीवरील नियंत्रण गमावणे किंवा अचानक ब्रेक फेल होणे, यासारख्या गोष्टींमुळे दुर्घटनाही होऊ शकते.

4) ट्रॅफिक सिग्नलचे पालन करा

ट्रॅफिक सिग्नलचे पालन न केल्यासही दुर्घटना होऊ शकते. वाहनाचे नुकसान तर होतेच, पण त्यामधील प्रवाशांना शारीरिक इजाही होऊ शकते, कधीकधी हे जीवघेणेही ठरू शकते. त्यामुळे ट्रफिक नियमांचे पालन करावे.

5) मद्यपान करून गाडी चालवू नये

मद्यपान करून गाडी चालवल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते. तसेच मोठा दंडही भरावा लागू शकतो.

6) गाडीची नियमितपमे देखभाल करा :

आपल्या गाडीची नियमितपणे देखभाल करणे, वेळोवेळी त्याचे सर्व्हिसिंग करणे महत्वाचे असते. खराब टायर्स बदलणे, तुटलेले हेडलाइट्स दुरुस्त करणे, साइड मिरर नीट करणे तसेच इंजिन ऑईल बदलणे, गरजेचे असते. अन्यथा दुर्घटना होऊ शकते.

7) आपल्या लेनमध्येच गाडी चालवा

भारतात रस्त्यांवरून लाखो गाड्या धावत असतात, त्यामुळे शिस्तीचे पालन करणे महत्वाचे आहे. गजबजलेल्या रस्त्यांवर लेन बदलून कधीही कार ओव्हरटेक करू नये. लेन बदलायची असेल तर न विसरता आधी सिग्नल द्यावा. अन्यथा तेही अपघाताचे कारण ठरू शकते.

8) सुरक्षित अंतर पाळा

गाडी चालवताना समोरच्या व आपल्या गाडीदरम्यान सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे असते. समोरची गाडी अचानक थांबल्यास टक्कर होण्याची शक्यता असते. सुरक्षित अंतरामुळे हा धोका टळतो व प्रवाशांचा जीव वाचतो.

9) उजव्या बाजूने ओव्हरटेक करावे

भारतात राईट-हँड ड्रायव्हिंग पाळले जाते. त्यामुळे एखाद्या गाडीला ओव्हरटेक करायचे असल्यास, नेहमी उजव्या बाजूने करावे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.